शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

धरणे असूनही दुष्काळाचे सावट

By admin | Published: April 28, 2016 2:17 AM

आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघा ५.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुढील काळात पिण्याची पाण्याची परिस्थिती गंभीर होणार आहे. या दोनही तालुक्यांना प्रथमच दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेआठ टक्के पाणी कमी झाले आहे़. सध्या पुणे, नगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांसाठी सोडण्यात आलेले पाणी अद्यापही सुरू असून, ३ ते ४ मेपर्यंत हे पाणी कुकडी डावा कालव्यामधून सुरू राहणार आहे़ जुन्नर तालुक्यात येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरण ही पाच धरणे आहेत़ या पाच धरणांच्या पाणीसाठ्यावर जुन्नर, आंबेगावसह पारनेर, श्रीगोंदा, करमाळा, कर्जत या तालुक्यांचे नियोजन अवलंबून आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्याला पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे़ पहिल्यांदाच अवघा ५.९६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ या पाणीसाठ्या पैकी बहुतांश पाणी बाष्पिभवनात जाणार आहे. त्याचाही परिणाम या साठ्यावर होणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठ्यातील पाणी दरवर्षी सर्वांना दिलासा देणार ठरते, मात्र यावर्षी मृतसाठ्यातून २.३ टीएमसी पाणी चार जिल्ह्यांसाठी सोडण्यात येणार आहे़ त्यात आज अखेर १४०० दलघफूट पाणी कुकडी डावा कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे़ हे पाणी ६ ते ७ मे पर्यंत सुरू राहणार आहे़ पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठा कमी झाला असून, सध्या २५०३ दलघफूट पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता जी़ बी़ नन्नोर यांनी दिली़ सद्य:स्थितीत सर्व धरणे मिळून अवघे १५१५ दलघफूट (४.९६ टक्के) साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीस ७३५७ दलघफूट (१३.५१ टक्के) साठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेआठ टक्के साठा कमी आहे. पाच धरणांपैकी आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणाची परिस्थितीदेखील यावेळी अत्यंत गंभीर आहे. (वार्ताहर)>४माणिकडोह धरणमार्गे घाटघर रस्त्यावरील सर्वच आदिवासी गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या आहेत. राजूर नं. १, राजूर नं. २, पेठेचीवाडी, निमगिरी, देवळे, अंजनावळे ही गावे अगदी माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटरलगत वसलेली आहेत. ही सर्व गावे कुकडी नदीच्या खोऱ्यात मोडतात. >४परंतु उन्हाळ्यात मात्र या गावात चांगलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. मुळात पाणीसाठा असताना तांत्रिक अडचणी, निकृष्ट काम, यामुळे कशाबशा अवस्थेत रडतकढत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना प्रामुख्याने बंद पडलेल्या आहेत. आदिवासी भागातील जवळपास सर्वच गावे खासगी पाण्याच्या स्रोतांवरच आता प्रामुख्याने अवलंबून आहेत. >४येडगाव धरणालगत बहुतांश गावांच्या नळपाणी योजना असल्यानेहे पाणीपुरवठ्यासाठी प्रमुख धरण मानले जाते़ या धरणामध्ये आजमितीस १०६२ दलघफूट (३७.९१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ माणिकडोह धरणामध्ये आजमितीस ३१ दलघफूट (०.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ वडज धरणामध्ये आजमितीस ९४ दलघफूट (७.९९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे़ पिंपळगाव जोगा धरणामध्ये ० टक्के साठा शिल्लक आहे़