शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
2
रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
3
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
4
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
5
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
6
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
7
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
8
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
9
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअड धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
10
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
11
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
12
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
13
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
14
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट; ७ मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?
16
बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
17
Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ
18
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
19
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
20
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?

रात्रनिवारा केंद्रांपासूनही दुष्काळग्रस्त वंचित

By admin | Published: September 06, 2015 1:14 AM

महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही.

- प्राची सोनावणे,  नवी मुंबई महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही. विदर्भ, मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांना रात्रनिवारा केंद्रांपासूनही वंचित राहावे लागत असून, नाइलाजाने संसार पुलाखाली व तंबूमध्ये थाटावा लागला आहे. राज्यातील भीषण दुष्काळामुळे विदर्भ व मराठवाड्यामधील अकोला, जालना, नांदेड, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील शेतकरी उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबईमध्ये येत आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतरही त्यांची फरफट थांबलेली नाही. शिक्षण कमी असल्यामुळे या ठिकाणी चांगली नोकरी मिळत नाही. नाक्यावर उभे राहून मिळेल ते मजुरीचे काम करावे लागत आहे. राहण्याची काहीही सुविधा नसल्यामुळे उड्डाणपुलाखाली व मोकळ्या जागेवर तंबू टाकून राहावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक लाख लोकसंख्या परिसरात एक याप्रमाणे रात्रनिवारा केंद्र सुरू करण्यास सांगितले होते. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी असून, तेथे जवळपास १२५ रात्रनिवारा केंद्रांची गरज आहे. नवी मुंबईची लोकसंख्या साडे बारा लाख असून, शहरात किमान १२ केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे. परंतु, मुंबईमध्ये अद्याप एकही रात्रनिवारा केंद्र सुरू केले नसून नवी मुंबईमध्ये फक्त एक केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रावर तीन वर्षांत तब्बल ८ लाख ९९ हजार रुपये खर्च केले असून, फक्त १८ आश्रितांना त्याचा लाभ होत आहे. मुंबई, नवी मुंबई व इतर महापालिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रात्रनिवारा केंद्रे सुरू केली असती आणि त्या ठिकाणी बेघर नागरिकांना रात्री मुक्कामाची, अल्पदरात चहा, नाष्टा व जेवणाची सोय केली असती तर दुष्काळामध्ये रोजीरोटीसाठी मुंबई, नवी मुंबईत येणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुलाखाली राहण्याची वेळ आली नसती. अनेक वृद्ध नागरिकांवर भीक मागण्याची वेळ आली आहे. . दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नाकडे शासन व महापालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.दुष्काळग्रस्तांचे आरोग्य धोक्यात निवाऱ्याची सोय नसल्यामुळे दुष्काळग्रस्तांनी पुलाखाली व इतर ठिकाणी आसरा घेतला आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू आहे. उघड्यावर राहणाऱ्या दुष्काळग्रस्तांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तुर्भे पुलाखाली राहणारी काही मुले अजारी पडली असून, पैसा नसल्यामुळे उपचार करता येत नाहीत. अशीच स्थिती राहिली तर दुष्काळग्रस्तांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राहण्याची सोय नसल्यामुळे उघड्यावर संसार थाटला आहे. घाणीमध्ये लहान मुलांना दिवसभर ठेवावे लागत आहे. घाणीमुळे व उघड्यावरच मुक्काम करावा लागत असल्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावाकडे दुष्काळामुळे तर मुंबईत निवारा नसल्यामुळे फरफट सुरू आहे. - प्रतिभा कांबळे, दुष्काळग्रस्त, जालना