शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गडकरींच्या ताकीदमुळे जिल्ह्यातील चार जलमार्गांचा अखरे मार्ग सुकर

By सुरेश लोखंडे | Updated: January 12, 2018 20:14 IST

यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

लोकमत इंम्पॅक्ट !सुरेश लोखंडेठाणे : जलमार्गांचा विकास करण्याची ताकीद देऊन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख चार जलमार्गांसह ठिकठिकाणच्या जलवाहतुकीचा मार्ग सुकर केला आहे. यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांनी दिलेल्या ताकीदमुळे जिल्हा यंत्रणा कामाला लागली आहे.राष्ट्रीय महामार्गांसह राज्य व मुख्य जिल्हामार्गांसह लोहमार्गांतील सततच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसह ठाणेकर रोज मरणयातना भोगत आहेत. त्यात ध्वनी व वायुप्रदूषणामुळे दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले आहे. या-ना-त्या कारणांमुळे होणारी सततची वाहतूककोंडी आणि प्रदूषणातून मुक्तता करणारे ठाणे जिल्ह्यातील जलमार्ग गांभीर्याने मार्गी लावणे लोकहिताचे असल्याचे लोकमतने प्रशासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून दिले आहेत. यामुळे लोहमार्गांवरील ताण कमी करणे शक्य होणार असून राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच ६३८ किमीच्या राज्यमार्ग व मुख्य जिल्हामार्गांवरील कोंडीदेखील जलमार्गामुळे कमी करणे शक्य होणार आहे. यासाठी प्रस्तावित सुमारे तीन हजार २५३ कोंटी खर्चाचे जलमार्ग मार्गी लावणे गरजेचे आहे.सर्वच महानगरांना लागलेले स्मार्ट सिटीचे वेध यामुळे जिल्ह्यातील महापालिकांकडे देशभरातील महानगरांच्या दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसह नवी मुंबई महापालिका-एमएमआरडीए भलेमोठे दोन हजार ८०० कोटींचे दोन ब्रॉड जलमार्ग यातील पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानचा १२ किमी लांबीच्या जलमार्गास, त्यासाठी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, वाशीगाव येथून खाडीकिनाºयावरून कोपरखैरणे-घणसोली-गोठिवली-रबाळे-ऐरोली व दिघा हा जलमार्ग उपनगरांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. वाशी ते ऐरोली व वाशी ते बेलापूरदरम्यानचा मार्गही त्वरित हाती घेण्याची गरज आहे.ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी खर्च होणार आहेत. यामध्ये इंद्रासिटी रूट ते घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत, दिवा हा जलमार्ग आहे. याशिवाय, ठाणे ते वसई, मीरा-भार्इंदर जलमार्ग, ठाणे ते भिवंडी, ठाणे ते डोंबिवली, कल्याण आदी चार जलमार्ग ठाणे मनपाने गांभीर्याने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार