शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण

By admin | Published: June 27, 2017 3:22 AM

सलग दोन दिवस पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अलिबागच्या समुद्राला चांगलेच उधाण आले होते.

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सलग दोन दिवस पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अलिबागच्या समुद्राला चांगलेच उधाण आले होते. उंच उडणाऱ्या लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी किनाऱ्यावर गर्दी केली होती. येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.मान्सून पुन्हा पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झाल्याने, गेल्या ४८ तासांमध्ये त्याने रायगडसह कोकण किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने तेथील नागरिकांची चांगलीच अडचण झाली होती. नगरपालिकेने नालेसफाईचा दावा केला असला, तरी वेगाने पाण्याचा निचरा होताना दिसून आले नाही. एकाच वेळी उधाणाची भरती आणि आकाशातून कोसळणारा पाऊस, यामुळे पाण्याचा निचरा होण्याला अडथळा निर्माण झाला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार समुद्राला उधाण येऊन साडेचार मीटरपेक्षा अधिक लाटा उसळणार असल्याने नागरिकांनी अलिबागच्या समुद्रकिनारी गर्दी केली होती. महाकाय लाटा किनाऱ्याला धडकत असताना मोठा आवाज होत होता. जिल्हा प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला असल्याने समुद्राच्या पाण्यात जाण्यापासून मज्जाव करण्यात येत होता. लाटा पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी जमल्याने तेथील विविध स्टॉलधारकांचा धंदा तेजीत होता. दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुरुडमध्ये-अलिबाग तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्यावर समुद्र उधाणाचे पाणी येण्याची परिस्थिती येथे दरवर्षी निर्माण होते. येथील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची दुरुस्ती गेल्या २० वर्षांपासून खारलॅण्ड विभागाकडून करण्यात आलेली नसल्याने या परिसरातील शेकडो एकर भातशेतीत समुद्राचे खारेपाणी घुसून पिकती भातशेती नापीक झाली आहे. रविवारी अंबा आणि कुंडलिका नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली होती. परिणामी, दोन्ही नदीतीरांवरील एकूण १६ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देऊन, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी दोन्ही नद्यांच्या पातळीत घट झाल्याने संभाव्य धोका टळला असल्याचे रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, पाताळगंगा, उल्हास या उर्वरित नद्यांची पातळी नियंत्रणात आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर गोवा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग या विरळ वाहतुकीही सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.सोमवार सकाळी ९ वाजल्यापासून पुढील १२० तासांत कोकणातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यात आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचेही पाठक यांनी अखेरीस सांगितले.