शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील गुन्हेगारी ‘बोकाळली’

By admin | Published: July 31, 2015 2:26 AM

गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा

मुंबई : गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपला आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना पवार म्हणाले की, २५ हजारांच्या हप्त्यासाठी पोलिसांनी मालवणीतील दारूकांडाच्या आरोपींना संरक्षण दिले होते. अशा अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचाच गुन्हा दाखल केला पाहिजे. अमली पदार्थांच्या माफिया महिलेशी थेट पोलिसांचे संबंध उघड झाले आहे. आम्ही सत्तेत होतो तेव्हा कायदा-सुव्यवस्थेवरून एकनाथ खडसे आमची लाज काढायचे, आता आम्ही कोणाची लाज काढायची असा बोचरा सवाल पवार यांनी केला. कॉ.गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडलेले आहेत पण सरकार माहिती दडवित असल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधून अजित पवार म्हणाले की, या हत्येचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. आम्ही वारंवार मागणी करूनही आमचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलीस संरक्षण का दिले जात नाही, पानसरे, दाभोलकरांसारखे त्यांचेही बरेवाईट व्हावे, असे तुम्हाला वाटते का, असा सवाल त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)मुख्यमंत्री तटकळलेआषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाची पूजा करायला मुख्यमंत्री सपत्नीक गेले तेव्हा त्यांच्या आधी सोलापूरचे कलेक्टर सपत्नीक पूजा करीत असल्याने मुख्यमंत्र्यांना सपत्नीक २० मिनिटे बाहेर ताटकळावे लागले, कलेक्टर पूजा करताहेत तोवर कासवाची पूजा करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी यावेळी केला. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे त्यावेळी तेथे होते. हा प्रकार पाहून ते इतके संतप्त झाले की तेथून निघून गेले. शेवटी भाऊसाहेब फुंडकरांनी त्यांना मन वळवूनआणले, अशी माहिती देऊन पवार म्हणाले की कलेक्टरनी १२ कोटी जनतेचा अपमान केला आहे.