शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

दूध न पाजल्यानेच बछड्यांचा मृत्यू

By admin | Published: December 30, 2015 12:38 AM

चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याच्या पाथरी वनक्षेत्रातील चार बछड्यांंचा मृत्यू हा वाघिणीने बछड्यांना दूध न पाजल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशी अहवालातून समोर आले असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मंत्रालयात पत्रकारांना दिली. तसेच त्या वाघिणीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाला कळविल्याचे त्यांनी सांगितले. या विशेष तपास पथकामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाचा एक अधिकारी, वन विभागाचा एक अधिकारी आणि पोलीस दलाचा एक अधिकारी यांचा समावेश असेल. या वाघिणीची शिकार झाली का, पाणी पिण्यासाठी गेली असतांना ती कुठल्या विहिरीत पडली का, या बाबींचा शोध सुरु आहे. ही घटना चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाबाहेरची घटना आहे. राज्यातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करत आहे. व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. पण बफर क्षेत्राबाहेर घडलेली ही घटना लक्षात घेऊन बफरक्षेत्राबाहेर वाघांचे अस्तित्व असलेल्या प्रदेशातही विशेष व्याघ्र संरक्षण दल नियुक्त करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. वाघांच्या शिकारीस प्रतिबंध करणारा केंद्रीय कायदा अधिक कडक करावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस पाठवली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)काँग्रेसचा आरोपचंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या ४ पिल्लांच्या मृत्यूसाठी वन खात्याची निष्क्रि यता कारणीभूत असल्याची टीका टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मृत पिल्लांची माता अजूनही बेपत्ता आहे. सदरहू परिसरात दोन वाघिण आणि एक वाघ असल्याची माहिती वनखात्याला होती. परंतु, योग्य पद्धतीने देखरेख न झाल्याने त्या दोन वाघिणींपैकी एक गरोदर आहे, हे वन खात्याला कळालेच नाही. तिला चार पिल्ले झाली तरी वन खात्याला कळाले नाही. ही निष्क्रि यतेची परीसीमा असून, आता पिल्ले मरण पावल्यानंतर आणि वाघिण बेपत्ता झाल्यानंतर सरकारला जाग आल्याचे सावंत म्हणाले.