शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

एमआयएममुळे राष्ट्रवादी धास्तावली

By admin | Published: November 05, 2016 3:36 AM

ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना आणि भाजपामध्ये इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत.

ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना आणि भाजपामध्ये इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत. त्याचवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक इतर पक्षात जाऊन स्थिरावले आहेत. राष्ट्रवादीने हे फारसे मनावर घेतले नसले तरी एमआयएमने ओवेसी यांची दणदणीत सभा घेऊन मुंब्य्रात शिरकाव केल्याने राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते आहे. स्थानिक पातळीवर एमआयएमची संघटनात्मक बांधणी पुरेशी नाही, पक्षाचे पुरेसे बस्तान बसलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रसेच्या नेत्यांनी पालिका निवडणुकीत एमआयएमचा फारसा प्रभाव जाणवणार नसल्याचा दावा केला आहे. मात्र यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी एमआयएमने लढत दिली आहे, तेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीलाच अधिक धक्का बसला आहे आणि शिवसेना, भाजपाचा फायदा झाला आहे. त्यामुळे मुंब्य्रात एमआयएम कितपत चालेल, यापेक्षाही त्यांच्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला किती धक्का बसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत काही ठिकाणच्या जागा सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत. कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यातही खरी लढत ही आता शिवसेना-भाजपामध्येच होणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ताकद वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा, राबोडी आदी भागांवर लक्ष केंद्रीत करुन मागील निवडणुकीइतक्या जागा कशा येतील, त्याचे गणित आखले आहे. त्यानुसार त्यांनी या भागांवर लक्ष केंद्रीत करुन मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यंदा कळव्यातून १६ आणि मुंब्य्रातून २० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. सध्या कळव्यात आणि मुंब्य्रात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा आकडा चढा आहे. त्यावरच राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची मदार आहे. त्यांची हीच सोपी गणिते बिघडविण्यासाठी मुंब्य्रात एमआयएमने दमदार प्रवेश केला आहे. (प्रतिनिधी)>राष्ट्रवादीतील बंडखोरांवर नजरनिवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीला इतर पक्षांनी धक्का दिला असून चार नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हे चारही नगरसेवक पूर्वीपासूनच आमचे नव्हते, असा दावा जरी राष्ट्रवादीची मंडळी करत असली तरी त्यांच्या नाराजांच्या फळीतील नेमके कोण एमआयएमच्या तंबूत जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.>ध्रुवीकरण सेनेच्या पथ्यावर?एमआयएमचा फायदा भाजपाला होतो. प्रसंगी मतांचे ध्रुवीकरण शिवसेनेच्याही पथ्यावर पडते. त्यामुळे आताही त्यांनीच मागल्या दाराने एमआयएमला मैदानात उतरविल्याची चर्चा आहे. एमआयएम मुंब्रा आणि राबोडीत उमेदवार उभे करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला याची दखल घ्यावी लागणार आहे. एमआयएमचे किती उमेदवार निवडून येतील याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी ते कोणाकोणाची गणिते बिघडवतात हे पाहणे महत्वाचे आहे.