शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट

By admin | Published: July 08, 2015 2:40 AM

गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ व जुहू विमानतळाजवळ होऊ घातलेल्या गगनचुंबी इमारतींमुळे मुंबईवर विमान दुर्घटनेचे सावट असून, या परिसरात अधिक उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विमानतळापासून २० कि़ मी. अंतरात बांधकाम करण्यासाठी विमान प्राधिकरण परवानगी देते. याअंतर्गत ४९.८७ मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी दिली जात होती. मात्र इमारतींना उंचीसंदर्भात देण्यात येणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्रांचे निकष ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या नेगी समितीने उंचीची मर्यादा ५६.२७ मीटरपर्यंत वाढविली. त्यानंतर २००८ -१२ या काळात जुहू व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात २०० इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. या इमारतींमुळे मुंबईला विमान दुर्घटनेचा धोका आहे, असा दावा करणारी जनहित याचिका अ‍ॅड. यशवंत शिनॉय यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच या दोन्ही विमानतळांच्या धावपट्टीजवळ सुरक्षेचे कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत. या धावपट्टींजवळ सुरक्षेचे उपाय करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.या याचिकेवर प्रत्युत्तर सादर करताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. ने व नागरी दळणवळण महासंचालकांनी ही जबाबदारी आमची नसल्याचा दावा केला. तर विमानतळ प्राधिकरणाने नेगीच्या रिपोर्टनुसार विमानतळ परिसरात इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. शिनॉय यांनी मंगळवारी या सर्व प्रतिज्ञापत्राचा तपशील न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सांगितला. याचे प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितला. तसेच या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या याचिकेवर पुढील शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)

लँडिंग-टेकऑफवेळी संपर्क तुटण्याची भीती
 
लँडिंग होताना पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात असतो. कंट्रोलच्या दिशा निर्देशानुसार विमानाचे सुरक्षित लँडिंग होते. असे असताना 56.27 मीटर उंचीच्या इमारती विमानतळ परिसरात उभ्या राहिल्यास पायलटचा व कंट्रोलच्या संपर्कातही अडचणी निर्माण होण्याचा मोठा धोका आहे. नेमके लँडिंग व टेकऑफवेळी संपर्क तुटल्यास मोठी विमान दुर्घटना होऊ शकते, असा दावा याचिकाकत्र्याने केला आहे.
------------------... शेकडो नागरिकांचा जाऊ शकतो बळीमुळात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसराला झोपड्यांचा विळखा अधिक आहे. यामुळे विमान दुर्घटना झाल्यास येथील शेकडो नागरिकांचा बळी जाऊ शकतो. तिच परिस्थिती जुहू विमानतळाची आहे. हा परिसर देखील झोपड्यांनी व्याप्त असून अधिक उंचीच्या इमारतींची संख्या देखील या परिसरात आहे. जुहू विमानतळावर सध्या ओएनजीसीसह खाजगी विमानांचे आवागमन असते.