शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

विमा कंपन्यांमुळे बळीराजा वाऱ्यावर, भरपाईत अडवणूक! ३७ लाख बाधितांपैकी केवळ ३ लाख शेतकऱ्यांना दिली भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 6:22 AM

खरीप हंगामातील पीकविमा प्रकरणात काही विमा कंपन्यांनी विम्याची भरपाई रक्कम देण्यापासून हात आखडता घेतला असल्याचे समोर आले आहे.

मुंबई/औरंगाबाद :

खरीप हंगामातील पीकविमा प्रकरणात काही विमा कंपन्यांनी विम्याची भरपाई रक्कम देण्यापासून हात आखडता घेतला असल्याचे समोर आले आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला ३७ लाख २ हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देय आहे. ही रक्कम १७९२ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, आतापर्यंत यातील केवळ ३ लाख शेतकऱ्यांना ९६.५३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.  राज्यात ३७ लाख २ हजार पीक विमा अर्जांपैकी १७ लाख २५ हजार अर्जांची नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली असून, ती १०७४ कोटी रुपये आहे. 

१९ लाख ७७ हजार अर्जांची नुकसान भरपाई रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. एकूण १६ जिल्ह्यांनी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यापैकी अकोला, अमरावती, सोलापूर जिल्ह्यांत विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत.  ५ लाख २१ हजार दाव्यांचे सर्वेक्षण रेंगाळले- शेतकऱ्यांच्या नुकसानीचे एक हजार ७४ कोटी रुपयांपर्यंतचे दावे पीकविमा कंपन्यांच्या कचाट्यात अडकले आहेत. अद्याप नुकसानीचे पूर्ण सर्वेक्षणच कंपन्यांनी केलेले नाही. सुमारे पाच लाख २१ हजार दाव्यांचे सर्वेक्षण रेंगाळले असून पीकविमा कंपन्या त्यासाठी चालढकल करत आहेत. - स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ५१ लाख ३१ हजारपैकी  ४६ लाख ९ हजार दाव्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अद्यापही ५ लाख २१ हजार दाव्यांचे नुकसान सर्वेक्षण बाकी आहे. 

‘लोकमत’ने लक्ष वेधल्यानंतर कृषी खात्याला जाग राज्यात पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याबाबत ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. पीक विम्याचा प्रीमियम आणि त्या मोबदल्यात दिली जाणारी तोकडी भरपाई या संदर्भात ‘लोकमत’ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर आता कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विम्यासंदर्भात आढावा बैठक घेतली.  आठ दिवसांत शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश पीक विम्यापासून राज्यातील एकही बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा सूचना कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपन्यांना या बैठकीत देण्यात दिल्या.  विम्याचे प्रलंबित दावे पाच दिवसांत निकाली काढून आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याचे आदेश कृषिमंत्री सत्तार यांनी या बैठकीत दिले. यात हलगर्जी झाल्यास कारवाईचा इशाराही विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला. 

या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विजयकुमार आवटे, विभागीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी, गिरीजेश शर्मा, समीर सावंत, भरत कारभारी, एच. आर. गंगवाल तसेच कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी व विमा कंपनीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईकंपनीचे नाव    निश्चित     वाटप     प्रलंबित एचडीएफसी-ईआरजीओ    १२९.६    ११६.६१    ७.९२ एआयसी    ९५६.४९     ९.९    ९४६.५९ आयसीआयसीआय-लोंबार्ड    ११३.०४    ७०.५३    ४१.५५ युनायडेट इंडिया    ५२०.०८    ००    ५२०.०८ बजाज अलायन्झ    ७२.३२    ७१.८४    ००

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र