शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
4
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
5
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
6
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
7
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
8
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
9
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
10
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
11
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
12
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
13
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
14
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
15
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
16
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
17
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
18
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
19
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
20
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!

मोठी बातमी! भाजपातील 'हे' २४ नेते अस्वस्थ; लवकरच ४-५ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 12:03 PM

विधानसभा लढायचीच आहे त्याशिवाय पर्याय नाही असा आत्मविश्वास असणारे काही नेते त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र काही ठिकाणी पक्षांतर होऊ शकते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यात इच्छुक उमेदवारांनी आपापली तिकीट फायनल करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यात हसन मुश्रीफ यांच्या महायुतीतील प्रवेशामुळे नाराज झालेले भाजपा नेते समरजितसिंह घाटगे यांनी पक्षाला रामराम केला. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे आज शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात समरजितसिंह घाटगे तुतारी चिन्हावर लढतील हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र भाजपात समरजितसिंह घाटगे यांच्यासारखे २४ नेते अस्वस्थ आहेत, ज्यातील ४-५ जण पक्ष सोडण्याच्याही तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की, भाजपाकडे २४ नेते असे आहेत जे अजित पवारांच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने लढत देऊ शकतात. आता या २४ जणांना आपलं पुढची वाटचाल कशी राहील अशी चिंता आहे त्यामुळे थोडी अस्वस्थता आहे. ४-५ भाजपा नेते हे शरद पवारांकडे जातील पण त्याठिकाणी गेल्यानंतर तिथे तुतारी लावणारे खूप आहेत असंही त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. 

तसेच आम्ही प्रत्येकाशी बोलतोय, समरजितसिंह घाटगे यांच्याशीही आम्ही चर्चा केली. हर्षवर्धन पाटील यांच्याशी देवेंद्र फडणवीसांनी खूप वेळा चर्चा केली. समरजितसिंहला थांबायचे नव्हते. त्यांना विधानसभा निवडणूक लढायचीच आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. भाजपात जे इनकमिंग झाले त्याठिकाणी तितक्या ताकदीचे उमेदवार नव्हते तिथे इतरांना पक्षात घेतलं जातं. जेवढं प्रभावी नेतृत्व पक्षात आणलं जातं, तेव्हा पक्ष वाढतो. हर्षवर्धन पाटलांना मागे उमेदवारी दिली ते पराभूत झाले. आता पुन्हा निवडणूक आली आहे. महायुतीत आता परिस्थिती वेगळी आहे. महायुती नसती तर ते उमेदवार झाले असते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, ज्यांना थांबायचे नाही, विधानसभा लढल्याशिवाय मार्गच नाही असे २-४ लोक जातील. त्यांच्या राजकीय आयुष्याला आम्ही का ब्रेक लावायचा. दुसऱ्याकडे जाऊन निवडून येतील असं त्यांना वाटतंय, भाजपा उमेदवारी देऊ शकत नाही अशा प्रकरणात आम्ही कसं रोखणार?. निवडून येतील असा आत्मविश्वास आहे ते जातील. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. सरकार आणि सरकारनंतरही ज्या ज्याठिकाणी ताकद द्यावी लागते ते आम्ही देतो. केंद्रात आपलं सरकार आहे. तिथे काही व्यवस्था आहे तिथे सामावून घेऊ असं सांगितले जात आहे. त्याशिवाय असेही बरेच जण आहेत त्यांना तिकीट नाही दिले तरी त्यांना घाई नाही. पक्ष सांगेल ते करू अशी भूमिका घेतात त्यांचीही यादी मोठी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  

टॅग्स :MahayutiमहायुतीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाharshvardhan patilहर्षवर्धन पाटील