शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मुंबईमध्ये नौदलाच्या भरतीवेळी चेंगराचेंगरी

By admin | Published: September 10, 2016 6:07 AM

मुंबईच्या मालाड परिसरात नौदलाच्या भरतीदरम्यान शुक्रवारी सकाळी उडालेल्या गोंधळानंतर चेंगराचेंगरी होऊन चार तरुण जखमी झाले.

मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरात नौदलाच्या भरतीदरम्यान शुक्रवारी सकाळी उडालेल्या गोंधळानंतर चेंगराचेंगरी होऊन चार तरुण जखमी झाले. या भरतीस अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने तसेच योग्य व्यवस्थापनाअभावी ही घटना घडल्याचे उमेदवारांनी सांगितले. यादरम्यान उमेदवारांवर मालवणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जात असून, मालवणी पोलिसांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे.नौदलाच्या आयएनएस हमलाच्या तळावर जवळपास १० हजार उमेदवार गुरुवारी रात्रीपासून दाखल झाले होते. नौदलाच्या स्पेशल रिक्रुटमेंट ड्राइव्ह फॉर सिनियर सेकंडरी रिक्रुट्स (एसएसआर) या पदासाठी ही भरतीप्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेपाच वाजता मैदानाचे गेट उघडणार होते. मात्र ते अर्धा तास उशिरा उघडले गेले. 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह', या तत्त्वानुसार होणाऱ्या या भरतीत आपला क्रमांक आधी लागावा, म्हणून गेट उघडताच हजारो उमेदवारांनी एकाच वेळी या मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यातून एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात काहींना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या उमेदवारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नौदलाकडून उभारण्यात आली नव्हती; त्यामुळे हा गोंधळ झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)>धावपळीत चार जण किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे लाठीचार्जच्या बातमीत काही तथ्य नाही, कारण असा प्रकार घडलेलाच नाही. - मिलिंद खेतले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणेपोलिसांनी जे केले ते फार चुकीचे होते. या सगळ्यामुळे मी मुलाखतीला मुकलो आणि त्यात माझ्या डोळ्यालाही मार बसला, ज्यासाठी मला पुण्याला जाऊन उपचार घ्यावे लागणार आहेत.- स्वप्निल जगताप, जखमी उमेदवार