शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

उद्यापासून आठ दिवस पावसाचे

By admin | Published: September 07, 2015 1:49 AM

केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे

मुंबई : केरळपासून कर्नाटकपर्यंतच्या द्रोणीय स्थितीमुळे ८ ते १५-१६ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह मुंबईत पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यानंतर मात्र वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सप्टेंबरचा उत्तरार्ध कोरडाच जाईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाने मान्सून राजस्थानातून परतीच्या प्रवासाला लागल्याची घोषणा शुक्रवारीच केली आहे. त्यानंतर परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास आठवड्याभराचा कालावधी लागणार असल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने राज्यासह मुंबईवरील पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. तत्पूर्वी द्रोणीय स्थितीमुळे वर्तविण्यात आलेल्या ठिकाणी पावसाने जोर धरला तर राज्याला काहीसा दिलासा मिळणार आहे. आणि दुसरीकडे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात होणाऱ्या वातावरणीय बदलामुळे राज्यासह मुंबईत कोरडेच वातावरण राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. शिवाय ६, ७, ८, ९ आणि १० सप्टेंबर रोजी मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची चिन्हे आहेत. तर पुढील ४८ तासांत मुंबईवरील आकाश ढगाळ राहील व हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)चक्रवात स्थितीस्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप आणि त्यालगतच्या भागावरील वातावरणात चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीचा प्रभाव तेलंगणापासून कर्नाटकाहून पुढे लक्षद्वीपपर्यंत आहे. त्यामुळे दक्षिण कर्नाटकातील भाग, कर्नाटकची किनारपट्टी आणि त्यालगतचा तामिळनाडूचा भाग तसेच उत्तर केरळ या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची आशा आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात सध्या सरासरीपेक्षा ४३ टक्के कमी पाऊस झाला आहे.