शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 05:03 IST

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून ...

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून अधिक उद्योग राज्याबाहेर गुजरातला गेल्याने आठ लाख नोकऱ्या गेल्या. जीएसटीने मोठे नुकसान झाले. रोजगाराची निर्मिती करण्याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नाही, असा घणाघात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला.

भाजप नेते सातत्याने राहुल गांधी व बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाने बोलतात. पण, राहुल यांची बहीण म्हणून सांगू इच्छिते की, काँग्रेस आणि बाळासाहेब यांची विचारधारा वेगळी असली, तरी आम्ही शिवरायांचा सन्मान करतो. तुम्ही शिवरायांचे नाव घेता, पण त्यांचा अवमान करता, अशी कठाेर टीकाही प्रियंका यांनी शिर्डी येथील सभेत केली. 

शिर्डी येथील सभेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील त्यांची राज्यातील ही पहिलीच सभा होती. कोल्हापुरातही त्या प्रथमच आल्या होत्या. या सभेत खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, कुस्तीपटू बजरंग पुनिया, आमदार विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

अपमानाविरुद्ध पेटून उठा...

जनता महागाईने पिचली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. युवक रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे. तरीही केंद्र व राज्यात बसलेले सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याची जबाबदार सरकारची नाही का? आपण आता हे बंद केले पाहिजे, या अपमानाच्या विरुद्ध पेटून उठले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

शिवरायांचा अवमान...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा भ्रष्टाचार झाल्याने पडला. शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाची फक्त कोनशिला ठेवली; परंतु पुढे काहीच झालेले नाही. त्यावरून शिवरायांबद्दल यांच्या मनात किती प्रेम आहे हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

भरघोस बहुमत द्यावे

राज्य सरकारने अडीच वर्षांत काहीही केले नाही. निवडणूक येताच लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा केली. आमचे सरकार येताच आम्ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये दरमहा देणार आहोत. त्यामुळे भरघोस बहुमत द्यावे, असे आवाहनही प्रियांका यांनी केले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी, या भूमीचा कट्टरतेला विरोध...

प्रियंका यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘साईबाबा की जय’, अशा घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी साईबाबांच्या समानतेच्या विचाराची आठवण करून दिली.

त्या म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीने धार्मिक कट्टरतेला सतत विरोध केला. ही भूमी सत्य, समानता व मानवता सांगते. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही शिकवण तुकारामांनी या भूमीतून दिली.

जातनिहाय जनगणनेबाबत...

राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत, असे मोदी बोलतात. मात्र, राहुल गांधी यांनी देशभर चार हजार किलोमीटरची न्याय यात्रा केली, हे ते विसरतात. राहुल गांधी जनतेला न्याय देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा उठवण्याची व जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. माझे आव्हान आहे की, पंतप्रधानांनी जातीनिहाय जनगणना करू व आरक्षणाची मर्यादा उठवू हे जाहीर करावे. राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Priyanka Gandhiप्रियंका गांधीMahayutiमहायुती