शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Maharashtra Political Crisis: “शिवसैनिकांना शिवभोजन थाळी, NCP-काँग्रेसला मोठमोठी पदं दिली”; शिंदे गटाचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:29 IST

Maharashtra Political Crisis: तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही शिवसैनिकाला लाचार व्हायला लावले, अशी घणाघाती टीका शिंदे गटातील खासदाराने केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहे.  दुसरीकडे शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्षही तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, राज्यभरातून एकनाथ शिंदेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना दिसत आहे. यातच आता शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. 

किती दिवस लोकांच्या तोंडाकडे बघायचे? लोकांकडे वर्गणी मागायची. आमच्या वर्गण्यांची संभावना तुम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादी) खंडणी म्हणून केली. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. पण महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही आम्हाला लाचार व्हायला लावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तोंडाकडे आम्हाला बघायला लावले. ही लाचारी आम्हाला मान्य नव्हती, असा हल्लाबोल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला. 

स्वाभिमान दुखावण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने केले

आम्ही १९९५ चे युती सरकार बघितले. त्यावेळी शिवसेनेने १ रुपयात झुणका भाकर विकायला लावली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आले. १० रुपयांत तुम्ही शिवभोजन थाळी विकायला लावली. एकीकडे राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना महाविद्यालये देत आहेत, मोठी पदे देत आहेत आणि माझा शिवसैनिक एक रुपयात झुणका भाकर विकतोय. १० रुपयांत शिवभोजन थाळी विकतोय. त्याचा स्वाभिमान दुखावण्याचे काम या मागच्या सरकारने केले, असा गंभीर आरोप हेमंत पाटील यांनी केला. 

तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती

तुम्हाला कुठेतरी पदावर बसायचे होते. तुमच्या घराण्याला पदे भूषवायची होती. तुम्हाला सत्ता भूषवायची होती. म्हणून ज्या लोकांनी ३५-३७ वर्षे आमच्यावर अत्याचार केले. त्यांना तुम्ही जवळ करून बसलात. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला आणि आमचे निर्दालन केले. कुठचे पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वमान्यांना न्याय नव्हता, असा घणाघात हेमंत पाटील यांनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे कशाप्रकारचा घडलेला माणूस आहे. दररोज २०-२० तास काम करतात. कधी मास्क नाही. कुणी हात पुढे केला तर लगेच हात मिळवतात. कुठलीही अस्पृश्यता बाळगत नाही, असे म्हणत हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळHemant Patilहेमंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे