शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
2
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
3
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
4
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
5
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
7
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
9
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
10
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
11
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
12
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."
13
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
14
लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
15
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
16
Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!
17
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
18
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
19
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
20
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

कार्यकर्त्यांनो, आतातरी भानावर या! स्वत:चं घरदार सांभाळा; नेते तुपाशी अन्...

By प्रविण मरगळे | Published: June 27, 2022 5:05 PM

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे

प्रविण मरगळे 

महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची परिस्थिती पाहिली तर केवळ घराणेशाही, प्रस्थापित मंडळी यांच्यासाठीच सगळं काही, हे चित्र दिसून येते. कार्यकर्ता म्हटला तर नेत्यावर जीव ओवाळून टाकणारा, त्याची निस्सीम 'भक्ती' करणारा माणूस. हा कार्यकर्ता अलीकडे प्रचंड संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं. कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न त्याला पडू लागलाय. तरीही, तो अजूनही श्रद्धेनं आपल्या 'विठ्ठला'ची पूजा करतोय. पण, खांद्यावरचा तो झेंडा (कुठल्याही रंगाचा, शिक्क्याचा असो) थोडा बाजूला ठेवून त्यानं थोडा विचार करायची गरज आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी अक्षरश: रिक्षावाले, पानटपरी चालवणाऱ्या तळागाळातील व्यक्तींना सोबत घेऊन 'शिवसेना' नावाची संघटना बनवली. पुढे या संघटनेचे रुपांतर राजकीय पक्षात झाले. बाळासाहेबांनी गरीब घरातील मुलं राजकारणात आणली. कुणी नगरसेवक, कुणी आमदार तर कुणी खासदार झाले. संघर्षाच्या काळात साथ देऊन अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व उदयास आणले. मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी बाळासाहेबांनी तरुणांमध्ये ज्योत पेटवली आणि याच ज्योतीची मशाल घेऊन शिवसेनेत अनेक नेते बनले. परंतु, अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांप्रती लोकांमध्ये असलेली आपुलकीची भावना कुठेतरी नष्ट होताना दिसत आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. अर्थातच, या घडामोडींवर सगळ्यांचं लक्ष आहे. पण, 'कार्यकर्ता' नावाचा गट ज्या प्रकारे रिएक्ट होतोय, तो काळजीचा मुद्दा आहे. अर्थात, हे नवं नाही.  

नेत्यांनी कुठेही जावं आणि कार्यकर्त्यांनी मागे भटकावं हेच वास्तव राजकारणात उरलं आहे. गणपतराव देशमुख यांच्यासारखे नेते ज्यांनी ११ वेळा विधानसभेत विजय मिळवला. एकनिष्ठ आणि एकच पक्ष असलेला असा लोकनेता पुन्हा होणे नाही. आजच्या राजकीय नेत्यांकडे पाहिले तर जिथे सत्ता तिथे चांगभलं. शेवटी राजकारणात सत्तेला अधिक महत्व असतं. राजकीय नेते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या मार्गाने वाटचाल करत असतात. कुणी टेंडरसाठी भांडते तर कुणी निधीसाठी, कुणावर ईडीची कारवाई होते तर कुणाच्या घरी कोट्यवधीचं घबाड सापडते. मात्र या सर्व घडामोडीत कार्यकर्त्यांचं काय होतं? 

नुकतेच एका नेत्यांच्या २ कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लीप ऐकायला मिळाली. नेते निवडणुका लढवणार, जिंकणार, पैसा कमवणार आणि कार्यकर्ते केवळ घोषणाबाजी, राडेबाजी, आंदोलन, मारामारी करायला पुढे जाणार. त्यात २०१९ नंतरच्या राजकारणानं कार्यकर्त्यांना जास्तच कन्फ्यूज केले आहे. आपण ज्या नेत्यांच्या मागेपुढे करतो ते नेते एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. समोर आले तर हात जोडून नमस्कार करतात. गळ्यात गळे घालतात. मात्र याच्याच विरुद्ध चित्र कार्यकर्ते समोरासमोर आले एकमेकांची डोकी फोडणार, कार्यालयं फोडणार, स्वत:वर गुन्हे दाखल करून घेणार, जेलमध्ये रात्र घालवणार अशीच बहुतांश प्रतिमा तयार झाली आहे. या ऑडिओ क्लीपमधील एक वाक्य मनाला भिडलं, ते म्हणजे 'आम्ही नेत्यांशी एकनिष्ठ पण नेतेच झाले बहुनिष्ठ" हे वाक्य आजच्या परिस्थितीला तंतोतंत जुळणारे आहे. 

सध्या शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोर झालेत. शिवसैनिक रस्त्यावर उतरला आहे. बंडखोर नेते हॉटेलमध्ये मुक्काम करतात आणि नेतृत्व मातोश्री ते शिवसेना भवन व्हाया वर्षा असा प्रवास करतात. सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात एक विधान केले. तुमचा मुलगा खासदार, माझा मुलगा बडवा, कसं चालेल? याचा साधा अर्थ असा की नेतेमंडळी स्वत:चं कुटुंब स्वत:ची जबाबदारी म्हणून सांभाळतात. नेत्याचा मुलगा नेताच असतो पण त्या कार्यकर्त्याचं काय जो नेत्यासाठी जीवाचं रान करतो? महाविकास आघाडीच्या राजकारणात तर आजवर ज्यांच्याशी भांडलो त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून नेत्यांनी सत्ता उपभोगली. परंतु, ज्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या, नेत्यांसाठी स्वत:च्या घराकडे दुर्लक्ष केले त्यांचे पुढे काय? आतातरी कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा, स्वत:च्या कुटुंबाकडे, बायका-पोरांसाठी वेळ द्यावा!

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी