शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"लोकांनी केलेली टीका, त्यांचे प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 21:43 IST

एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक सवाल

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. हे सरकार सत्तेत येऊन जवळपास दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी भाजपा आणि शिंदे गट यांच्याकडून नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे सत्तास्थापना झाल्यानंतर बरेच वेळा दिल्लीवारी करताना दिसले. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली. तशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पत्रकार परिषद आपल्या फेसबूक पेजवरून लाईव्ह केली होती. त्यावेळी त्यांनी फेसबुकवरील कमेंट्सचा पर्याय बंद ठेवला होता. त्यावरून राष्ट्रवादीने त्यांना काही कात्रीत पकडणारे सवाल केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक स्क्रीनशॉट शेअर केला असून त्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करत सवाल केली. "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवाद साधत नाहीत, असा आरोप करुन शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या फेसबुक पेजवर लोकांशी संवाद होऊ नये अशी तरतूद केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीवारी करत असल्यामुळे अनेक लोक फेसबुकवरच मुख्यमंत्र्यांना आपले प्रश्न विचारतात. प्रसंगी कडक भाषेत टीका करतात. ही टीका, प्रश्न सहन झाले नसावेत म्हणून हे कमेंट सेक्शन बंद करण्यात आले आहे का? मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांची इतकी भीती का वाटावी? असा प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सना पडला आहे", अशा शब्दांत NCP च्या अधिकृत फेसबूक पेजवरून मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आले.

दरम्यान, राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. आधी हे अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती होती. पण या संदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले असून अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे. ९ ऑगस्ट म्हणजे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे विस्तारानंतर किमान एक आठवडा मंत्र्यांना आपल्या खात्याचा आढावा आणि अभ्यास करता यावा या हेतुने अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसFacebookफेसबुक