शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:00 PM

राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एवढेच नाही, तर मूळ शिवसैनिक मतदारांपैकी किती टक्के मतदार आपल्याकडे वळला आणि किती टक्के दुसऱ्या बाजूला गेला याची आकडेवारीही शिंदे यांनी यावेळी मांडली. ते बुधवारी मुंबईमध्ये पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत हेते. यासंदर्भात त्यांनी केलेला दावा भविष्यात उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो, असे बोलले जात आहे.

शिंदे म्हणाले, "या संपूर्ण वावटळीमध्ये (लोकसभा निवडणूक) , या एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो मुळ आधार आहे, जो मतदार आहे, तो शिफ्ट झाला नाही. तो दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. याचे उदाहरण म्हणजे, शिवसेनेचे १९ टक्के मतदार होते. बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेच्या या १९ टक्के मुळ मतदारांपैकी १४.५ टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आले आणि ४.५ टक्के मत तिकडे राहिली. हे या निवडणुकीत (लोकसभा निवडणूक) त्यांनाही कळलंय. मग इतर मते कशी आली? कुठून आली? उमेदवार कसे जिंकले? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणून, मी एवढंच सांगतो की, ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती काही दिवसांनी उतरतेही." 

"हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील" -"एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार, असे काही लोक बरळत होते. मात्र, या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा शिंदे संपला नाही, हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने. माझ्या या व्यासपीठावरील सहकाऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला."

"...ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय" -शिंदे म्हणाले, "अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. तुमचं आणि या महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि हे प्रेम जोवर माझ्यासोबत आहे. तोवर हा एकनाथ शिंदे कधीही घाबरणार नाही. कधी घाबरला नाही. ज्या प्रकारचं धाडस या देशात कुणी केलं नाही, ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. यामुळे भीती माझ्या रक्तात नाही. माझ्या शब्दकोशात नाही."

"खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जिनतेनेच दिला आहे," -शिंदे म्हणाले, "कोकणात उबाठा साफ, ठाणे, कल्याण, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ. मुंबईत चार जागा कशामुळे गेल्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपण १३ जागा समोरासमोर लढलो. त्यातील 7 जागा आपण जिंकल्या. यात उबाठाचा स्ट्राईक रेट आहे ४२ टक्के, तर आपला ४७ टक्के आहे. त्यांना १३ जागांवर ६० लाख मते मिळाली, तर आपल्याला ६२ लाख मते मिळाली. आपल्या १५ उमेदवारांना ७४ लाख मते मिळाली. अर्थात सरासरी ४ लाख ९३ हजार मते मिळाली. त्यांच्या २१ उमेदवारांना किती मते मिळाली? तर ४ लाख ५० हजार. म्हणजेच आपण सगळीकडे उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जिनतेनेच दिला आहे," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक 2024Votingमतदान