शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Eknath Shinde: संतोष बांगर उद्धव ठाकरेंसोबत राहून काय करत होते? एकनाथ शिंदेंचा हिंगोलीतून मोठा गौप्यस्फोट

By विजय पाटील | Updated: August 8, 2022 23:02 IST

Eknath Shinde: संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते.

 हिंगोली : राज्यात विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेराेजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहोत. यात पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हिंगोली येथील शिवसेनेच्या सभेत केले.

संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

यावेळी मंचावर माजी मंत्री संजय राठोड, आ. बालाजी कल्याणकर, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. विप्लव बाजोरिया, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे, सुभाष बांगर, फकिरा मुंडे, राम कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात आ. संतोष बांगर यांनी मराठा आरक्षण, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे कळमनुरी येथेही कार्यालय, लमाणदेव मंदिर, आदिवासी भवनासाठी प्रत्येकी ५ कोटी, औंढा नागनाथसाठी ६० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेची मंडळी टीका करीत असल्याने आमचा नाद करू नका. अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा इशारा दिला. दगड मारा, गाडी फोडा जिल्हाप्रमुख करू, असे म्हणणाऱ्यांना महिनाभरापासून जिल्हाप्रमुख भेटत नाही. तुम्ही काय टक्कर देणार, असा सवाल केला.

यावेळी खा. हेमंत पाटील यांनीही माजी खासदार सुभाष वानखेडेंवर टीका करून महाराजांच्या वंशजाला राज्यसभा देत नसाल तर शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला काय अधिकार, असा सवाल नाव न घेता उद्धव ठाकरे यांना केला. शिवसेनेने शिवसैनिकांना कायम लाचार बनवून ठेवल्याचा आरोपही केला . 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील महिनाभरापासून लोक नावे ठेवत आहेत. मात्र त्यांना कामातून चोख उत्तर देऊ. जनतेला महायुतीचे उमेदवार म्हणून मते मागितली. बाळासाहेबाच्या हिंदुत्वाच्या विचाराने मते मागितली. तो विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत बसणेच योग्य आहे. यात चूक कोणाची? हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जेथे जातोय, तेथे प्रसन्न मुद्रेने लोक स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले. आता डबल इंजीनचे सरकार आहे. केेंद्र भरभरून मदत करायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तसे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले. तर अतिवृष्टीत झालेले नुकसान मी डोळ्यांनी पाहिले, यापूर्वी कधी झाली नसेल तेवढी मदत देऊ, असे जाहीरपणे सांगितले.

१० कोटींचा निधी जाहीरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनाला दहा कोटींचा निधीही जाहीर करून टाकला. तर औंढा नागनाथच्या विकासासाठी मंजूर झालेले ६० कोटी लवकरच मिळतील. विपश्यना केेंद्र, अन्नप्रक्रिया उद्योग याला चालना देऊ. बाळापूरला तालुकानिर्मितीबाबत सकारात्मक असून नासाची प्रयोगशाळा केंद्र शासनाकडे मुद्दा मांडून मार्गी लावू, असेही ते म्हणाले. तर ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावून खेड्यापाड्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षण महायुतीच्या काळात दिले होते. नंतर हे प्रकरण आता न्यायालयात आहे. ते मिळण्यासाठी तज्ज्ञांची फौज उभी करू. मात्र तोपर्यंत मराठा समाजाला विविध फायदे देण्यात येत असल्याचेही शिंदे म्हणाले.

संतोष बांगर एकेक आमदार माझ्याकडे पाठवत होतेआ.संतोष बांगर हे माझे चेले आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडत होता. उलट ते आम्हाला बाहेर काहीही बोलत असल्याने लोकांना वेगळे वाटायचे. मात्र ते एकेक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्य वेळी आपले पत्ते उघडले. गरजेच्या वेळी ते आमच्या बाजूने उभे राहिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली