शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 10:18 IST

Raj Thackeray MNS : राज ठाकरे यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने मनसेचे निवडणूक चिन्ह धोक्यात आले आहे. 

मुंबई : निकालानंतर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाची मान्यता कायम राहण्यासाठी किमान तीन आमदार निवडून येणे आणि तीन टक्के मते मिळणे आवश्यक होते. आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या ८ टक्के मते मिळणे आवश्यक होते. मात्र, मनसेला केवळ १.८ टक्के मते मिळाली आहेत.

२००९ मध्ये १३ आमदार असलेल्या मनसेचा २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आला. परंतु, २०१४ मध्ये पक्षाला राज्यात १६ लाख ६५ हजार तर २०१९ मध्ये १२ लाख ४२ हजार १३५ मते मिळाली होती. यावेळी मनसेने १२३ उमेदवार दिले होते. प्रत्यक्षात मात्र मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच केवळ १.८ टक्के मते मिळाली आहेत. 

पक्ष मान्यता टिकवण्यासाठी निकष काय? 

एखाद्या पक्षाला निवडणूक आयोगाकडील अधिकृत मान्यता टिकवायची असेल तर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या किमान ८ टक्के मते मिळवणे आवश्यक आहे.

1 आमदार किंवा एकूण मतदानाच्या ८ टक्के मते मिळाली तर मान्यता राहू शकते. 

2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे.

3 आमदार किंवा एकूण मतदानाच्या ३ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता कायम राहते. 

निवडणूक चिन्ह जाणार, पक्ष नाव कायम राहणार

"निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेऊ शकतात. आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो. सध्याच्या मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. मान्यता रद्द होणे म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असते, ते त्यांना घ्यावे लागेल. कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत; पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होत नाही", अशी माहिती विधान मंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना