शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

ठामपा करणार कचऱ्यापासून वीजनिर्मिती

By admin | Published: May 20, 2016 2:45 AM

पालिकेने १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपला मोर्चा शीळ येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या बंद दगडखाणीच्या ठिकाणी वळवला

ठाणे : डायघर आणि तळोजा डम्पिंगचा प्रश्न बारगळल्याने पालिकेने १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपला मोर्चा शीळ येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या बंद दगडखाणीच्या ठिकाणी वळवला आहे. वन खात्याने परवानगी दिल्यानंतर आता पर्यावरण विभागानेही यावर शिक्कामोर्तब केल्याने अखेर पुढील आठवड्यात ही जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्यानुसार, पालिका येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून वीजनिर्मिती करणार आहे. याशिवाय, प्रभागस्तरावर आणि इतर माध्यमातून विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवले जाणार असल्याने भविष्यात पालिकेला ४०० मेट्रीक टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिका क्षेत्रात आजघडीला ७०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला अद्यापही डम्पिंग उपलब्ध झालेले नाही. २००४मध्ये शासनाकडून पालिकेला डायघर येथील १८.८९ हेक्टर जमीन मिळाली आहे. तीवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मे. हेंजर बायोटेक एनर्जीज लि. या संस्थेबरोबर २००८मध्ये करारनामा केला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने तो प्रकल्प बासनात गुंडाळावा लागला. त्यामुळे सध्या पालिका दिवा येथे कचरा टाकत आहे. परंतु, येथील नागरिकांचा विरोध वाढल्याने पालिकेने तोही प्रकल्प गुंडाळला होता. मात्र, आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, मौजे शीळ येथील बंद असलेल्या दगडखाणीच्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, या प्रकल्पाला स्थायी आणि महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. वन विभागाच्या हद्दीत ही जागा असून, याला आता त्यांनी मान्यता दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावरील समितीनेदेखील याला हिरवा कंदील दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेदेखील याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे; आणि पर्यावरण व वन विभागाकडूनदेखील मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, आता या प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी जाणार असून, यासाठी २२ लाखांचा खर्च करून सल्लागारदेखील नेमला आहे.आता सर्व अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर पुढील आठवड्यात पालिकेच्या ताब्यात ही जागा येणार आहे. शहरातून सुमारे १२५ सोसायट्यांकडून जमा केलेला १०० मेट्रीक टन ओला, सुका कचरा गोळा केला जात आहे. आता हाच कचरा या जागेवर टाकला जाणार असून, रिसायकल पद्धतीने येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे; आणि त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळत नसल्याने आता महापालिकेने डी-सेंट्रलाइज पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार वूड टू वेस्ट हा प्रकल्पही कार्यान्वित झाला आहे. त्याशिवाय, येत्या काही महिन्यांत त्या-त्या प्रभाग समितीमध्येच कचऱ्याचे विविध स्वरूपाचे २ ते ५ टनापर्यंतचे प्रकल्प उभारून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्टिंग आणि गांडूळ खत प्रकल्पाचे प्लांट उभारले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय ई वेस्ट, जैविक खत प्रकल्प आदींसह विविध स्वरूपाचे प्रकल्पही मार्गी लागण्याच्या बेतात आहेत. >निविदाही अंतिम टप्प्याततळोजाचा प्रकल्प बारगळल्याने पालिकेने पुन्हा डायघरसाठी हालचाली सुरू केल्या असून, येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याच्या निविदाही अंतिम झाल्या असून, लवकरच तोही मार्गी लागणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.