शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

बीडमध्ये दुष्काळामुळे अकरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू

By admin | Published: April 20, 2016 11:44 AM

दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने योगिता देसाईचा मृत्यू झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
बीड, दि. २० - दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना बीडमध्ये अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने योगिता देसाईचा मृत्यू झाला आहे. योगिता देसाई भर उन्हात हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती त्यावेळीच तिला चक्कर आली आणि मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील साबलखेडा गावात ही घटना घडली आहे.
 
डोक्यावर सुर्य तळपत असताना योगिता देसाई गावापासून 500 किमी अंतरावर असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. तिने पाच फे-या मारल्या होत्या. योगिता गेले काही दिवस आजारी होती. पण तरीही ती पाणी भरण्यासाठी गेली होती. पाचव्या फेरीला तिला चक्कर आली आणि खाली कोसळली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले, मात्र तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हार्ट अॅटॅक आणि शरिरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
 
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे बीडदेखील सलग तिस-या वर्षी दुष्काळाचा सामना करत आहे. रविवारी बीडमधील तापमान 42 डिग्रीवर पोहोचले होते. देशभरात उष्मघातामुळे 110 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात ओडीसामध्ये 45 तर तेलंगणामध्ये 35 लोकांचा मृत्यू झाला आहे.