शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

अकरावी आॅनलाइन अर्ज २९ जूनपर्यंत भरता येणार

By admin | Published: June 28, 2017 2:05 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांना गुण दिसत नव्हते तसेच अर्ज भरताना अन्य अडचणी येत होत्या. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातला फोन सतत खणखणत होता. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवलेली असून २९ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी नि:श्वास सोडला. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. १३ जून रोजी आॅनलाइनवर दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १६ जून रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज दोन भरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दुसरा अर्ज भरत असताना अनेक अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रस्त झाले होते. त्यामुळे संकेतस्थळातील त्रुटी काढून टाकण्यासाठी नवीन कंपनीला एक दिवस देण्यात आला. या कंपनीने एका दिवसात त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. शिक्षण उपसंचालक विभागानेही त्रुटी दूर झाल्याचे स्पष्ट केले. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतत विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या म्हणूनच पालकांनी तेथे हजेरी लावली होती. अनेक विद्यार्थ्यांचे वाढीव गुण शेवटच्या दिवशीही संकेतस्थळावर दिसत नव्हते. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची वाढ देण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.