शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

शालेय व उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीवर जोर

By admin | Published: March 19, 2017 2:32 AM

महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयांची स्थापना, नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याच्या घोषणेबरोबरच राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात

- विजय बाविस्कर

महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयांची स्थापना, नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याच्या घोषणेबरोबरच राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी केलेली तरतूद समाधानकारक आहे. मात्र, राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, अर्थमंत्र्यांच्या भाषणात याचा उल्लेख आला नाही. त्यामुळे नवीन कायदा कसा राबविला जाणार, हा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) हा केंद्र शासनाचा कार्यक्रम राबविण्यासाठी ४० कोटी निधी प्रस्तावित केला. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग हा देशातील सर्वात जुना विभाग असून लवकरच शतकपूर्ती करणार आहे. या विभागाचे नामकरण मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था असे करण्यात येणार असून येत्या पाच वर्षांत विभागाला २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अर्थविषयक अभ्यासक्रमासाठी ही स्वागतार्ह बाब आहे. कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक व सांगली जिल्ह्यातील पेठ येथे कृषी महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद येथे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू होत आहे. राज्यातील मुंबई, नागपूर व औरंगाबाद या तीन विधी विद्यापीठांच्या विकासासाठी ३९ कोटी २८ लाख रुपये निधी प्रस्तावित केला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचे बांधकाम व बळकटीसाठी भरघोस निधीची घोषणा केली आहे. ५५९.३० कोटींची तरतूद यासाठी अर्थमंत्र्यांनी केली आहे. अस्मिता योजना : राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्याचा मानस मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.