शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला मनाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 11:00 PM

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला ?

ठळक मुद्देनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय

- प्रशांत ननवरे-बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चित करण्यात येणार आहे.हा आकृतीबंध निश्चित  होवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू नये,असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.        जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत.मात्र,याच दरम्यान राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तोंडावर आलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा अधिकारी,कर्मचारी यांचा आकृतिबंध कसा असावा, याबाबत साखर आयुक्तांनी साखरसंचालकांच्या   अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तसेच, समितीने सादरकेलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आकृतिबंध निश्चित करण्याचे कामप्रगतीपथावर आहे.राज्यातील बहुसंख्य साखर कारखाने हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. उसउत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी ची रक्कम वेळेत देणेही अडचणीचे ठरत आहे.काही कारखान्याच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेले आहे.या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चितहोवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये. साखर आयुक्तांनी याबाबत हे आदेश साखर कारखान्याच्या निदर्शनास आणावेत,त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश सहकारविभागाचे सचिव प्रमोद वळंज यांनी दिले आहेत.या निर्णयाबाबत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ''लोकमत' शी  बोलताना सांगितले की,  राज्यातील साखर कारखान्यांनीआकृतीबंधाप्रमाणेच नोकरभरती करणे आवश्यक आहे. कामगारांना पगारवाढ दिलीजाते, दरवर्षी ८.३३ टक्के बोनस दिला जातो. ते देण्याबाबत दुमत नाही. पगारवाढ आणि बोनस कामगारांना मिळालाच पाहिजे.तो त्यांचा हक्क आहे.मात्र, अनावश्यक भरती करु नये. शेतकरी आणि कामगार एकाच रथाची दोनचाके आहेत. दोन्ही समाधानी राहणे आवश्यक आहे. सहकारी साखर कारखान्याचामालक असणारा ऊस उत्पादक सभासद बाजुला टाकला जावु नये,याची दक्षता घेण्याचीगरज जाचक यांनी व्यक्त केली.———————————————

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार