शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

‘दारुबंदी’चा सक्षम कायदा होणार

By admin | Published: November 07, 2016 1:31 AM

दारूमुळे खेड्यापाड्यांमध्ये महिलांवर अन्याय होत आहेत. शाळेतल्या मुलींवरही अत्याचार होत आहेत. त्यामुळे ‘दारुबंदी’चा सक्षम कायदा करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली

पुणे : दारूमुळे खेड्यापाड्यांमध्ये महिलांवर अन्याय होत आहेत. शाळेतल्या मुलींवरही अत्याचार होत आहेत. त्यामुळे ‘दारुबंदी’चा सक्षम कायदा करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असून, दारू पिणाऱ्याला आणि बनवणाऱ्याला तडीपारीची कठोर शिक्षा त्यात असेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी येथे सांगितले.सजग नागरिक मंच या माहिती अधिकार क्षेत्रातील संस्थेच्या दशकपूर्ती मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. निवृत्त केंद्रीय सचिव माधव गोडबोले प्रमुख पाहुणे होते. मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर, कार्यकारी विश्वस्त जुगल राठी, विश्वस्त विश्वास सहस्रबुद्धे व्यासपीठावर होते. हजारे यांच्या या वक्तव्याचे नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. हजारे म्हणाले, ‘‘दारुबंदीचा कडक कायदा करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. माधवराव गोडबोले यांच्यासमवेत कायद्याचा मसुदा बनविला जात आहे. मी, मला, माझे असेच आत्मकेंद्रित वातावरण आहे. काहीजण तर दुसऱ्याचे तेही माझे असे म्हणणारे आहेत. अशा वातावरणात निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करणाऱ्या सजग नागरिक मंचसारख्या संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा संस्था जागोजाग निर्माण झाल्या पाहिजेत,’’ते म्हणाले, ‘‘पार्टीशाहीने खरी लोकशाही रुजू दिलेली नाही. सरकार घाबरते पराभवाला. ते पाडण्याची शक्ती येणार नाही, तोपर्यंत खरी लोकशाही येणार नाही. गावात आलेला पैसा खर्च करण्यापूर्वी ग्रामसभेत निर्णय करावा, असे अभिप्रेत आहे. ग्रामसभा सर्वश्रेष्ठ आहे, पण लोकांना तिचे महत्त्वच समजलेले नाही. ’’माहिती अधिकार कायद्यासाठी जनतेचे केलेले संघटन, १९९७ पासून २००६ पर्यंत दिलेला लढा. कायदा लागू झाल्यानंतर, त्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारने केलेला प्रयत्न, त्याविरोधात आळंदीत केलेले उपोषण यांचा ऊहापोह करून हजारे यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मध्यस्थी करण्यासाठी पाठविल्याची व कायद्यात बदल केला जाणार नाही, असे लेखी आश्वासन आपण त्यांच्याकडून घेतल्याची आठवण सांगितली. अजूनही या कायद्यामध्ये काही त्रुटी असल्याचे त्यांनी सांगितले.माहिती अधिकार कायदा खासगी संस्थांनाही लागू झाला पाहिजे, अशी मागणी गोडबोले यांनी यावेळी केली. वेलणकर लिखित ‘ग्राहकराजा जागा हो’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले. सजग नागरिक मंच व पीएमपी प्रवासी मंचसाठी लक्षणीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार हजारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. (प्रतिनिधी)