शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

माण तालुक्याचे टंचार्ईचे दुष्टचक्र संपेना

By admin | Published: April 13, 2015 5:09 AM

सातारा जिल्ह्यात एप्रिल २०१४मध्ये अवघ्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये वाई तालुक्यात २ तर माण तालुक्यात १ टँकर होता

सातारा जिल्ह्यात एप्रिल २०१४मध्ये अवघ्या तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यामध्ये वाई तालुक्यात २ तर माण तालुक्यात १ टँकर होता. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने यंदा टंचाईची तीव्रता वाढली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १६ टँकर सुरू करण्यात आले आहेत. सर्वाधिक पाणीटंचाई माण तालुक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. माणमध्ये ८, खटाव २, कोरेगाव १, फलटण १, वाई तालुक्यात ४ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी भूजल पातळी वाढली होती़ यंदा ती जवळपास ५ मीटरने खालावली आहे़ परिणामी, मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ सांगलीत केवळ ३३ टक्के साठासांगली : गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठाही बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये सुमारे ३३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षाच्या तुलनेत या वर्षी ४ टक्के पाणीसाठा वाढला आहे. या सप्ताहात या वर्षातील पहिला टँकर जत तालुक्यातील उमराणी या गावी सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सांगली जिल्ह्यात ८३ लघू व मध्यम प्रकल्प आहेत. यामधील एकही भरला नसला तरी, यामध्ये सध्या ३३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २९ टक्के साठा होता. २०१२-१३मध्ये सांगली जिल्ह्यात ६२ टँकरने पाणीपुरवठा सुुरू होता. गतवर्षी ९ टँकर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होते. या वर्षी मात्र एकच टँकर सुरू आहे. मे अखेरपर्यंत २० टँकर सुरू करावे लागतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.