शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांंना धीर द्या - बागडे

By admin | Published: January 31, 2016 1:40 AM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन दिला पाहिजे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी केले.वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गेल्या १८ जानेवारीपासून मराठवाड्यात काढण्यात आलेल्या ज्ञानोबा- तुकोबा आधार दिंडीचा शनिवारी औरंगाबादेत हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते समारोप झाला. यानिमित्त क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीस शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. बागडे म्हणाले, मोठा आर्थिक भार आणि न परवडणारी शेती हे प्रमुख कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे आहे. निराश न होता मार्ग काढा, कष्टाशिवाय पर्याय नाही, श्रमाला प्रतिष्ठा आहे, हे या आधार दिंडीतून सांगण्याचे आवाहन बागडे यांनी यावेळी केले. संपूर्ण कर्ज माफी का होत नाही, याचाही ऊहापोह त्यांनी केला. हभप तनपुरे बाबा यांनी सांगितले की, या देशात मोठमोठाली देवस्थाने आहेत, पण एकाही देवस्थानाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला नाही. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिर ट्रस्टने मात्र १०० कोटी रुपये दिले. आत्महत्या केल्यानंतर पैसे वाटण्यापेक्षा आत्महत्या होणारच नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे. असे पैसे वाटणाऱ्यांभोवती मात्र माध्यमांचा गराडा असतो, असे हभप शिवलीकर तात्या म्हणाले. यावेळी श्रीकांत महाराजांनी शपथेचे वाचन केले. (प्रतिनिधी)