शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

इंजिन बंद, ६ मच्छीमारांची सुटका

By admin | Published: January 17, 2017 3:44 AM

दांडी येथून तीन दिवसांपासून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या गीतांजली या नौकेचे इंजिन अचानक बंद पडले.

हितेन नाईक,

पालघर- दांडी येथून तीन दिवसांपासून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या गीतांजली या नौकेचे इंजिन अचानक बंद पडले. रात्री महाकाय लाटा आणि दोरखंडात अडकून बुडण्याच्या संकटावर मात करीत मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहा मच्छीमारांची स्थानिकांनी दोन दिवसांच्या अथक परिश्रमातून शोध घेत गुजरातच्या सागरी क्षेत्रातून सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले.दांडी येथील मच्छिमार नंदकुमार तामोरे हे आपली गीतांजली हि नौका अन्य ६ खलाशांना सोबत घेऊन एकदिवसीय मच्छीमारीसाठी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निघाले. २ -३ तासांचा प्रवास केल्यानंतर प्रवाहाचा अंदाज घेत त्यांनी आपली जाळी समुद्रात सोडली. संध्याकाळी ५ वाजता त्यांनी ती नौकेत घ्यायला सुरुवात केली. रात्री १०.३० वाजता नौकेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे ती वाहत जाऊ लागली. या दरम्यान उत्तरे कडून जोरात वारे वाहू लागल्याने नौका भरकटू लागली. त्यांच्या कडे वायरलेस सेट नसल्याने आणि त्यांच्या जवळील मोबाईल ची बॅटरी हि संपल्याने त्यांचा घराशी संपर्क तुटला. एखादी मच्छिमार नौका आली की त्याची मदत घेऊ असा विचार करून ते वाट पाहू लागले. मात्र मोठमोठी व्यापारी जहाजे आजूबाजूने जात असल्याने ओरडून, बोटीतील लाईटच्या सहाय्याने त्यांना दूर जाण्याचा इशारा करीत होते. शेवटी त्यांनी नौकेतील कापडाचा एक शीड बनवून त्याच्या सहाय्याने किनारा गाठता येतो का? ह्यासाठी प्रयत्न सुरु केला. ह्याच वेळी समुद्रातील महाकाय खडकांचा मागोवा घेत ते डोळ्यात तेल टाकून रात्रीच्या मिट्ट काळोखात लक्ष देत होते. प्रवाह नेईल त्या दिशेने प्रवास चालला असताना अचानक ती एका बाजूला कलंडली. आपली नौका दोरखंडात अडकल्याची जाणीव होऊन तामोरेंसह अन्य दोन मच्छीमारांनी समुद्रात उड्या घेतल्या. कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी आपल्या कवी रोवताना समुद्रात सोडलेल्या फुग्याच्या (बुडडी) दोरखंडात नौकेचा पंखा व सुकाणू सापडल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी सुरे घेऊन ते दोरखंड कापून टाकल्या नंतर कलंडलेली नौका सरळ झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.सकाळी मच्छीमारीला गेलेली नौका रात्र झाली तरी परत बंदरात न आल्याने सर्वांच्या घरात काळजीचे सावट पसरले. वायरलेस सेट वरून सातपाटी, डहाणू, मुरबे इ. भागातील नौकाना संपर्क करून गीतांजली चा शोध घेण्याबाबत सांगण्यात आले. मात्र सकाळ पर्यंत काहीच पत्ता लागत नसल्याने शेवटी त्या नौकेचा शोध घेण्यासाठी मोरया प्रसाद आणि कल्पतरू ह्या दोन नौकांसह २० ते २५ मच्छिमार वसई आणि उंबरगावच्या दिशेने निघालो. अखेर संध्याकाळी ४.३० वाजता गीतांजली नौका उंबरगावच्या समोरील सागरी प्रवाहात वहात जात असल्याचे त्यांना दिसून आली. अन्न, पाण्या वाचून तीन दिवस व्याकुळलेल्या गुरूदत्त म्हात्रे, बबलू , वसंत गोवारी , चंद्रकांत पागधरे , भीमा आरेकर यांना आपल्या नौकेत घेऊन माघारी फिरले आणि ते सर्व सुखरूप े दांडी च्या किनाऱ्यावर पोहोचल्या नंतर सर्व कुटुंबीयांनी, आणि गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगामुळे बोटीवर वायरलस सेट असण्याचे महत्व स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)>वायरलेस, नाही तर हॅम सेट तरी पाहिजेअसा प्रसंग कोणत्याही नौकेवर कधीही येऊ शकतो. हे लक्षात घेऊन खोल समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक मच्छीमार बोटीवर उत्तम क्षमतेचा वायरलेस सेट किंवा हॅम रेडिओ सेट असणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट झाले आहे. तटरक्षक दलाची मदत तत्परतेने आणि पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही असा अनुभव यापूर्वी अनेकदा आल्यामुळे वरील दोन पैकी एक संच बोटीवर असणे अनिवार्य करण्याची गरज आहे.