शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही ‘काम’ देणार

By admin | Published: April 02, 2017 3:02 AM

तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या ज्ञानाचा वापर करता येत नाही. यावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणे

पुणे : तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात त्या ज्ञानाचा वापर करता येत नाही. यावर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही ग्रामीण भागात जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासविषयक कामे देण्याबाबत विचार सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.मनुष्यबळ विकास मंत्रालयासह विविध संस्थांच्या सहकार्याने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’मध्ये पुण्यासह देशभरातील २६ केंद्रांतील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुण्यात कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या आवारात या स्पर्धेचे केंद्र आहे. या ठिकाणी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. या संवादादरम्यान एका विद्यार्थिनीने वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन काम करणे बंधनकारक असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनाही अशी संधी मिळाल्यास ग्रामीण भागाचा विकास होईल, असे मोदी यांना सुचविले. यावर मोदी यांनी गुजरातमध्ये असा प्रयोग यापूर्वीच केला असल्याचे सांगितले. तिथे सुटीच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विविध समस्या सोडविण्याची कामे त्यांना देण्यात आली होती. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. केंद्र स्तरावरही हा विचार सुरू आहे, असे मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानाचा झपाट्याने वापर वाढत असून आपले जीवनमानही त्यानुसार बदलत आहे. दैनंदिन जीवनातील लोकांच्या गरजा भागविणे, जीवनमान उंचावणे तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. सर्व समस्या सरकारच सोडवेल, हा भ्रम असून लोकसहभागाशिवाय ते शक्य होणार नाही. यामध्ये तरुणांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’ आजच्या तरुणाईमध्ये खूप क्षमता असून, नवनवीन कल्पनांचा ध्यास ती घेते. या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी संकल्प करून त्यासाठी अपार कष्ट करायला हवेत. त्यामध्ये गुणवत्तेशी तडजोड करता कामा नये, असा सल्ला मोदी यांनी दिला. दरम्यान, हॅकेथॉनमध्ये देशातील विविध अभियांत्रिकी, आयआयटी, एनआयटी तसेच इतर संशोधन संस्थांमधील १,२६६ संघांमध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दि. १ व २ एप्रिल असे दोन दिवस देशातील २६ शहरांमध्ये एकाच वेळी हॅकेथॉनची अंतिम फेरी होत आहे. राज्यात पुण्यासह मुंबई आणि नागपूर या केंद्रांचा त्यामध्ये समावेश आहे. एकूण २९ मंत्रालये व विभागांशी संबंधित विविध समस्या, अडचणींवर उपाययोजना शोधण्यासाठी या अभिनव हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या उपाययोजना, कल्पना सुचविणाऱ्या संघांना पारितोषिके दिली जाणार आहेत. दि. २ एप्रिल रोजी रात्री या स्पर्धेचे निकाल जाहीर केले जातील. (प्रतिनिधी)