शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
2
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
3
मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
4
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
5
अजितदादा काँग्रेसला धक्का देणार?; ४ आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
6
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
7
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
8
एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
9
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
10
Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
11
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
12
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
13
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
14
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
15
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  
16
गुजरातमध्ये भिंत कोसळल्याने ७ मजूरांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
17
Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."
18
'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
19
Ranji Trophy Elite 2024-25 : अय्यरच्या पदरी 'भोपळा'; टीम इंडियात कमबॅकचा मार्ग कसा होईल मोकळा?
20
"नवी मुंबई विमानतळाला श्री रतन टाटा यांचं नाव द्यावं", अभिनेते परेश रावल यांची मागणी

उद्योजकतेतून घडवा सशक्त भारत-प्रणव मुखर्जी

By admin | Published: September 16, 2015 2:12 AM

देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते.

नागपूर : देशात उद्योजकतेचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे. परंतु तंत्रज्ञान व उपलब्ध मनुष्यबळाच्या योग्य उपयोगाने त्यास यश मिळू शकते. अभियंत्यांनी ‘पॅकेज’च्या मागे धावण्यापेक्षा उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच सशक्त भारताचे निर्माण होईल, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. मंगळवारी ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेम रमेश औटी याचा सर विश्वेश्वरैय्या पदकाने सन्मान करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव मंचावर उपस्थित होते.शिक्षणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास करणे शक्य आहे. देशातील समस्यांचे त्याद्वारे निराकरण होऊ शकते, असे राष्ट्रपती म्हणाले. जागतिक क्रमवारीत बंगळुरू येथील ‘आयआयएससी’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स) १४७ तर ‘आयआयटी-दिल्ली’चा (इंडियन इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १७९ वा क्रमांक आहे. ‘आयआयटी-मुंबई’चा २०२ वा क्रमांक असल्याचे सांगत शिक्षणसंस्थांनी दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुखर्जी यांनी केले. देशात बुद्धिमत्ते कमतरता नाही, तिचा उपयोग योग्य प्रकारे केल्यास राष्ट्र प्रगतीचे शिखर गाठेल. संशोधनातूनच देशातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मौलिक मदत होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे आणि देशातील तांत्रिक क्षेत्रातील आयात कमी करण्यासाठी नवे संशोधन व मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग व्हायला हवा, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)