शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

धरण सुरक्षेसाठी विभागीय स्तरावर समित्यांचे गठण

By admin | Published: August 07, 2014 10:05 PM

मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने विभागीय स्तरावर सुधारित समित्या गठित केल्या आहेत.

खामगाव: मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने विभागीय स्तरावर सुधारित समित्या गठित केल्या आहेत. राज्यातील सहा विभागांमध्ये या समित्या राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने धरणांची पाहणी करून, काही त्रुटी आढळल्यास त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी या समित्यांची राहणार आहे.धरणांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. पुण्यातील माळीण गावात अलिकडेच घडलेल्या दुर्घटनेने धरणांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मोठय़ा धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागासह कोकण, पुणे, नाशिक आणि मराठवाडा या सहा विभागांमध्ये सुधारित समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. क्षेत्रिय मुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेल्या या समितीमध्ये मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदींचा समावेश राहणार आहे. या समित्यांनी त्यांच्या विभागातील धरणांची वेळोवेळी पाहणी करून, धरणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे अपेक्षित राहणार आहे. धरणांचे बांधकाम, तेथील उपकरणांच्या आधारे मिळणारे अहवाल तसेच विविध स्तरावर असलेल्या त्रुटी तपासण्याचे काम समितीला करावे लागणार आहे. समितीला धरणांची पाहणी दोन टप्प्यांमध्ये करावी लागणार असून, सहा महिन्यातून एकदा समितीची बैठक आयोजित करणे बंधनकारक राहणार आहे.