शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

राज्य पुनर्रचना आयोग स्थापन व्हावा

By admin | Published: April 10, 2016 2:58 AM

सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची

नागपूर : सध्या देशात काही राज्यांची लोकसंख्या ही १० ते २० कोटी आहे तर काही राज्यांची लोकसंख्या लाखांत आहे. ही विषम स्थिती दूर व्हावी, यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करायची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मा. गो. वैद्य यांनी येथे केले.युगांतर शिक्षण संस्थेच्या सभागृहात ‘लहान राज्यांची संकल्पना व विकास’ या विषयावर मा. गो. वैद्य बोलत होते. राजकुमार तिरपुडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा. गो. वैद्य म्हणाले, लोकसंख्या व लोकांचे हित हे निकष ठरवून नवीन राज्याची निर्मिती करण्यात यावी. ही निर्मिती करीत असताना नवीन राज्याची लोकसंख्या कमाल ३ कोटी आणि किमान ५० लाख असावी, अशी आपली अपेक्षा आहे. परंतु आयोग किंवा शासन त्यांना वाटते तसे निकष ते गृहीत धरू शकतात. (प्रतिनिधी)राज यांनाही एक दिवस जायचे आहेमनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाचा विरोध करताना मा. गो. वैद्य यांच्यावर टीका केली होती. वैद्य यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ झाली आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याला मा. गो. वैद्य यांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्यांना जी भाषा येते, ते त्याच भाषेचा वापर करणार. मी म्हातारा झालो आहे, आज ना उद्या जाणारच आहे. प्रत्येकाला जायचेच आहे. त्यांनाही एक दिवस जायचे आहे, असे ते म्हणाले.मी ९३ वर्षांचा आहे. आणखी ७ वर्षे जगण्याची माझी इच्छा आहे. कुणी पिस्तूल घेऊन माझ्यावर गोळी झाडली तर गोष्ट वेगळी, अन्यथा ७ वर्षांनी शतक साजरे करेन, असे वैद्य यांनी सांगितले.संघाचे दायित्व माझ्याकडे नाहीमी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवक्ता होतो; पण आता नाही. त्यामुळे हे माझे व्यक्तिगत मत आहे. संघाशी त्याचा काहीही संबंध नाही. संघाने स्वतंत्र विदर्भाबाबत उघड भूमिका कधीही घेतली नाही. मात्र त्यांच्या संघटनात्मक रचनेत त्यांनी विदर्भ हे स्वतंत्र राज्य मानलेले आहे, असे मा. गो. वैद्य म्हणाले.स्वतंत्र विदर्भाचे समर्थनस्वतंत्र विदर्भ राज्य हे अपरिहार्य आहे. त्याचे मी समर्थन करतोच. परंतु मी जे वक्तव्य केले होते, ते केवळ विदर्भाशीच संबंधित नव्हते; तर एकूणच भारताच्या संबंधात होते. नवीन राज्याची निर्मिती ही लोकांची आवश्यकता, सुविधा व हिताचा विचार करून झाली पाहिजे. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये. परंतु आपल्याकडे आंदोलन केल्याशिवाय नवीन राज्याची निर्मितीच केली जात नाही, ही बाब चांगली नाही, असे त्यांनी सांगितले.माझे निकष मान्य केले तर महाराष्ट्राची चार राज्ये होतील. एका भाषेची अनेक राज्ये झाली तर वाईट काय आहे, असा सवाल करून मा. गो. वैद्य म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर मराठी भाषेचे वा अस्मितेचे कुठलेही नुकसान होणार नाही.