शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"ब्रम्हदेव आलातरी २०२४ पर्यंत मंत्रिपद नको; प्रहार आमदारांची संख्या १०-११ करणार"

By नितीन काळेल | Updated: August 23, 2023 20:48 IST

बच्चू कडू यांची घोषणा : आम्ही बसू तेथेच सरकार बसणार; मला दाबण्याची कोणात ताकद नाही

सातारा : मला दाबण्याची कोणाची ताकद नाही. मंत्रिपदही सर्वोच्च नाही. दिव्यांग मंत्रालय दिले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा खूप आभारी आहे. त्यामुळे ब्रम्हदेव आलातरी २०२४ पर्यंत मंत्रिपद घेणार नाही. उलट प्रहारची ताकद वाढवून आमदारांची संख्या १० ते ११ वर नेणार आहे. आम्ही बसू तेथे सरकार बसेल,’ अशी घोषणाच माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानासाठी सांगलीला जात असताना कडू साताऱ्यात थांबले होते.

बच्चू कडू म्हणाले, ‘कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढीमुळे शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. शासनालाच पैसे जमा होणार आहेत. हे पैसे शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. पूर्वी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांबाबत केले. तेच आता भाजपही करत आहे. हे सरकार कांदा खाणाऱ्यांचा विचार करते. पण, पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा नाही. कांद्याचा दर वाढल्याने सरकार पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने कांद्याचा दर कमी झाल्याने सरकार पडायला हवे. सातवा वेतन आयोग घेणारे, आयकर भरणारे कांदा महाग झाला म्हणतात. शेतकऱ्यांच्या मालावरच का ओरड होते. यावरुन लक्षात येते की कृषी क्षेत्रावर कोणाचे नियंत्रण नाही.

राज्यात नोकर भरती होत असून एक हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून कडू पुढे म्हणाले, ‘ केरळ राज्याच्या धर्तीवर वर्षाला परीक्षाऱ्थींकडून सर्वच परीक्षांसाठी एक हजार रुपये भरुन घ्यावेत. कारण, ही सेवा आहे. कमाईचे साधन नाही. त्याचबरोबर गुणवत्तेवर पेपर व्हावेत. कंपन्यांकडून परीक्षा न घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्या घेण्याची गरज आहे.

आपण स्पष्टपणे बोलता त्याचा तोटा होतो का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर कडू यांनी माझे आडनाव कडू आहे. त्यामुळेच मी भाेगतो आहे, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच प्रहारची ताकद वाढविण्यासाठी काय करणार ? यावर त्यांनी विधानसभेला महायुतीकडे १५ जागा मागणार आहे. नाही मिळाल्यातर स्वतंत्र लढू. पण, १० ते ११ आमदार निवडूण आणणार, असा दावाही केला.

दादा मुख्यमंत्री होण्याबाबत भविष्यवेत्त्याला विचारतो...

राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत आले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद केव्हा मिळेल. यावर त्यांनी दादा पाचवेळा उपमुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री कधी होणार यासाठी भविष्यवेत्त्याला विचारतो, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू