शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवर एवढा पाऊस का कोसळला? जे सिंधुदूर्ग, रत्नागिरीत घडले, तेच... हवामान विभागाने कारण सांगितले
2
'वरुण' पाऊस कोसळतोय, दुपारी समुद्राला भरती; पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईचे तळे होणार?
3
कांदा, दूध दरवाढीचे खासदार निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित
4
एकच साप सहावेळा चावला, पिछा सोडविण्यासाठी तरुण मावशीकडून काकाकडे गेला, तिथेही...
5
मंत्री अन् आमदारांना पावसाचा फटका; अनिल पाटील, अमोल मिटकरींचा रेल्वे ट्रॅक वरून पायी प्रवास
6
“तुम्ही कसे निवडून येत नाही ते बघतो, इथली निवडणूक आपण जिंकू”; शरद पवारांचा कुणाला शब्द?
7
'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता
8
रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
9
Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
10
Jagannath Yatra: पुरीच्या जगन्नाथाला एकादशीच्या दिवशीसुद्धा भाताचा नैवेद्य चालतो; वाचा त्यामागील कथा!
11
Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."
12
Karan Johar Kids: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो? मुलांच्या प्रश्नांमुळे करण जोहर हैराण; म्हणाला...
13
इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता
14
Russia Ukraine War : भीषण! रशियाने युक्रेनवर डागले रॉकेट; ५० हून अधिक हवाई हल्ले, ११ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी
15
अंगारकी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा गणपती बाप्पाचे विशेष पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी
17
रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ, ५०० पार गेला भाव; १ लाखांचे झाले ४४ लाख रुपये
18
बेपत्ता होऊन घरवापसी झालेला 'सोढी' पहिल्यांदाच मीडियासमोर, म्हणाला- "माझा फोन बंद त्यामुळे.."
19
साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक
20
Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 2:11 PM

मविआतील जागावाटपाबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीत चांगला, त्यांनी पैशावर जागा जिंकल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. 

 नाशिक - शिवसेना २१ जागा लढली, त्यातील काही जागा, सांगलीतील जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही २० जागाच लढलो, ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा आमच्याविरोधात काम करत होती. केंद्राकडून सगळ्यात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले, त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय कोणी ठेवू नये. आम्ही तिघे एकत्रित लढलो आणि तिघांचा एकत्रित स्ट्राईक रेट चांगलाय असं विधान खासदार संजय राऊत यांनी करत काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाला सूचक इशारा दिला आहे. नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. त्यामुळे २८९ जागा कुणी घेऊ शकत नाही. आम्ही तिघे एकत्रित बसू आणि जागावाटपावर चर्चा करू. लोकसभेत अनेक जागांवर गैरसमजाने मतदान झाले. राज्यातील लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केले. लाखो मते बनावट शिवसेनेला गेली. मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीचा चांगला आहे. पैशाने स्ट्राईक रेट वापरून त्यांनी जागा जिंकल्या.मुंबईच्या जागेवर स्ट्राईक रेटवाल्यांनी दरोडा टाकला. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या गेल्यात असा आरोप त्यांनी केला.

तसेच महाविकास आघाडीची उद्या बैठक नाही. बैठक होती,परंतु महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेते दिल्लीत आहेत. जागावाटपावर अजून चर्चा झाली नाही. शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. १० जागा ते लढले त्यातील ८ जागा जिंकल्या हे खरे आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रात १०० च्या वर जागा आहेत ज्या भाजपा ५०० ते १५०० या फरकाने जिंकला आहे. त्यातील बहुसंख्य जागा प्रशासनावर दबाव आणून विजयी करून घेतल्या. धुळ्याची जागा विजयी घोषित करावी असा दबाव केंद्राचा तिथल्या प्रशासनावर होता. शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली. ६० ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असताना विजयी घोषित करा यासाठी भाजपा नेते प्रयत्नात होते. धुळ्याची जागा भाजपा लुटण्याच्या प्रयत्नात होती परंतु काँग्रेसच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि काँग्रेस जिंकली. अशाप्रकारे १०० च्यावर जागा मोदी-शाह यांच्या भाजपानं ओरबडल्या आहेत. हे सरकार अस्थिर आहे. ज्यादिवशी हे सरकार कोसळेल तेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीsangli-pcसांगली