शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

सर्वांनी पाणी जपूनच वापरावे : शरद पवार

By admin | Published: May 16, 2016 1:11 AM

पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

खडकवासला : ‘‘शहराला पिण्यासाठी व हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील गावांना पिण्यासाठी, शेती, कारखानदारीला पाणी देण्यासाठी त्या त्या काळी चार धरणे बांधली. परंतु वाढत्या लोकसंख्यमुळे या धरणांतील सर्वात जास्त पाणी पुणे शहराला द्यावे लागत आहे. त्यानंतर, उर्वरित पाणी तालुक्यातील गावांना व शेतीला द्यावे लागते. त्यामुळे आता पुणेकर आणि शेतकऱ्यांनी पाणी जपूनच वापरले पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. खडकवासला परिसरात ग्रीन थंब संस्थेकडून महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत धरणातील गाळ काढण्याच्या प्रकल्पाला शरद पवार यांनी रविवारी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ग्रीन थंब संस्थेचे कर्नल सुरेश पाटील, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अंकुश काकडे, जालिंंधर कामठे, कुमार गोसावी, रवींद्र माळवदकर, हेमंत रासने, विकास दांगट, नवनाथ पारगे, नितीन दांगट, किसन जोरी, काका चव्हाण, कैलास खिरीड, आनंद मते, प्रवीण शिंंदे उपस्थित होते. पवार म्हणाले, भोर, वेल्हे, मुळशी व हवेली या मावळी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो. पूर्वी लाकूडफाटा कोळशा यासाठी जंगल तोडले. सह्याद्रीचे डोंगर बोडके झाले. परिणामी पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात माती वाहून येते येऊन धरणे गाळाने भरली गेली. कोयना धरणात परिसरात जंगल जास्त असल्याने त्या धरणात सर्वात कमी गाळ आहे, असेही पवार यांनी सांगितले.व्हिएतनामप्रमाणे धरणसाठ्यात माशांचे पिंंजरे टाकून ‘केज फार्मिंग’ (मत्स्यशेती) करावे. मोठे लोखंडी पिंंजरे तयार करावे. त्यात मत्स्यबीज टाकून ते पिंंजरे मग पाण्यात सोडायचे. त्यांना नियमित खाद्य टाकले, की नऊ महिन्यांत मासा एक किलोचा होतो. त्या देशात हा मोठा व्यवसाय आहे. ही योजना दक्षिणेतील राज्यात सुरू असून, ते दरवर्षी १६ हजार कोंटीचे मासे निर्यात करतात. कोयना धरणात व रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे प्रकल्प राबविला आहे. कर्नल पाटील म्हणाले, सध्या जलयुक्त शिवारचा गाजावाजा होत आहे. परंतु यामध्ये मोठ्या त्रुटी आहेत. पैसा वाया गेला आहे.