शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

आयुक्त जयस्वाल यांना ठार मारण्याचे दलालांचे कारस्थान

By admin | Published: February 12, 2017 2:29 AM

महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता

ठाणे : महापालिका ही दलाल आणि भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली होती. त्यांच्या तावडीतून ठाणे शहराची सुटका करण्याकरिता संजीव जयस्वाल यांच्यासारखा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवला होता. परंतु, त्यांनाच दलालांनी ठार मारण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, त्यामुळेच आज ठाण्याचा विकास साधला गेला, असेही ते म्हणाले.ठाणे महापालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराकरिता आयोजित विकास संकल्प सभेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, विनय सहस्रबुद्धे, आ. संजय केळकर व शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, जयस्वाल यांना मुख्यमंत्री कार्यालयाऐवजी ठाण्याचा विकास करायला धाडले होते. त्यांनी बेकायदा बांधकामांवर धडाकेबाज कारवाई करून दलालांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे बिथरलेल्या दलालांनी त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या. खुद्द जयस्वाल यांनीच ही माहिती मला फोनवर दिली. आपण दलालांच्या धमक्यांना भीत नाही. मात्र, आपले काही बरेवाईट झाले, तर सरकारने आपल्या पत्नीची काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांनी आपल्याला केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही जयस्वाल यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. त्यामुळेच ठाण्याचा विकास करणे जयस्वाल यांना शक्य झाले आहे. परंतु, याचे श्रेय घेण्याचे काम येथील सत्ताधाऱ्यांनी करू नये, असे खडे बोल सुनावले. उद्धव ठाकरे हे प्रचारादरम्यानसारखे कल्याण-डोंबिवली महापालिकेला देण्यात येणाऱ्या साडेसहा हजार कोटींचे काय झाले, असा सवाल करतात. परंतु, त्यासाठीच्या अहवालाचे काय झाले, हे सेनेच्या महापौरांनाच विचारा, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेतातशिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत प्रचार करताना काँग्रेस सरकारने मेट्रो आणली असे म्हणतात आणि ठाण्याची मेट्रो शिवसेनेने आणली, असे सांगतात. अशी दुपट्टी भूमिका घेऊन कोणाचेही श्रेय लाटण्याचा त्यांना अधिकार नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला. मुंबईत आणि ठाण्यात मेट्रो आणण्याचे काम आमच्याच सरकाराने केले असून अल्पावधीतच त्या कामाला सुरुवातही झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.