शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

By admin | Published: December 31, 2014 2:29 AM

राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे.

मुंबई/ सांगली : राज्यात दोन महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारचा दुसरा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी सांगलीत याविषयीचे सूतोवाच केले. आणखी १२ जणांचा समावेश मंत्रिमंडळात केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. विस्तारामध्ये भाजपाला सहा मंत्रिपदे तर मित्रपक्षांना सहा मंत्रिपदे मिळतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने दोन राज्य मंत्रिपदे रिक्त ठेवलेली आहेत. याचा अर्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल, असे मानले जात आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती; पण ती त्यांनी अमान्य करीत केंद्रात मंत्रिपद मिळण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. राज्यात रिपाइंच्या वाट्याला येऊ पाहणारे मंत्रिपद भाजपाला द्यावे आणि आठवले यांनी केंद्रात मंत्री व्हावे, असा प्रस्ताव भाजपाकडून येऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)सध्या राज्य मंत्रिमंडळात भाजपाचे २० आणि शिवसेनेचे १० मंत्री आहेत. आपल्या मंत्रिमंडळाचा आकार फार मोठा नसेल, असे फडणवीस यांनी सुरुवातीला म्हटले होते. मात्र पाटील यांचे विधान लक्षात घेता ४२ जणांचे मंत्रिमंडळ असेल, असे मानले जात आहे.