शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

युती सरकारकडूनच अपेक्षा

By admin | Published: September 20, 2016 1:34 AM

निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती.

पुणे : निष्क्रिय आघाडी सरकारच्या काळात आपले प्रश्न सुटणार नाहीत, याची जनतेला खात्री होती. त्यामुळेच मराठी समाजाने आघाडी शासनाच्या काळात मोर्चे काढले नाहीत. युती सरकारवर त्यांचा विश्वास असून, आपले प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्यानेच मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत, असा दावा जलसंपदामंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे केला.जलयुक्त शिवार योजनेची पुणे विभागाची आढावा बैठक प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवन येथे झाली. यावेळी पत्रकारांनी मराठा समाजाच्या मोर्चांबाबत विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. ‘आघाडी सरकारने पंधरा वर्षांत काहीच केले नाही. युती सरकार आल्यानंतर दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा काम सध्या सुरूआहे. कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कोपर्डीतील ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीयांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात येणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. तसेच या खटल्यावर पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नियंत्रणाखाली चालविला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>आघाडी सरकारने भिजत ठेवलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाच्या प्रश्नाला युती सरकारने गती दिली. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न सोडवला. सरकारने केलेली ही कामे विरोधकांना पाहावत नाहीत. राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचेही प्रश्न आहेत. मुख्यमंत्री मोठ्या तडफेने सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत चर्चेची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.