शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

मराठवाड्याला ‘पॅकेज’ची अपेक्षा

By admin | Published: September 01, 2015 1:59 AM

तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे

विकास राऊत, औरंगाबादतीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या मराठवाड्यावर यंदाही निसर्ग कोपलेला आहे. आॅगस्ट महिनाही कोरडाच गेल्याने पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे ठाकण्याची भीती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ सप्टेंबरपासून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांतील पीक-पाण्याचा आढावा घेणार आहेत. दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे. पाऊसच नसल्याने विभागात खरीप हंगाम वाया गेला. लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांना सर्वाधिक फटकाबसला. उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आता जळालेले पीक पाहण्यावाचून काहीच उरलेले नाही. त्यातचकर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.मराठवाड्यातील एकूण ४३ लाख ९४० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी ३२ लाख ५३८ हेक्टरवर (७५ टक्के) खरीप पेरणी झाली. मात्र पावसाअभावी पेरणी वाया गेली. विभागात आजवर केवळ ३२ टक्के पाऊस झाला.भर पावसाळ्यातच मराठवाड्याचा ‘टँकरवाडा’ झाला आहे. एक हजार गावे टंचाईग्रस्त झाली असून, १ हजार ३०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील ७ जिल्ह्यांमधील चारा छावण्यांसाठी आगामी तीन महिन्यांसाठी ३०० कोटींचा निधी लागेल. पशुधन वाचविण्यासाठी बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात प्राधान्याने छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली वगळता उर्वरित ७ जिल्ह्यांतील पशुधनासाठी रोज तीन ते सव्वातीन कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचा अहवाल प्रशासनाने केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्यातील स्थितीचा आॅगस्टमध्ये आढावा घेतला. केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंग यांनी आॅगस्टच्या मध्यास विभागाचा धावता दौरा केला. त्यानंतर २३ व २४ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. त्यात मराठवाड्याचा अनुशेषही गाजला.