शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 14:39 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाय धुण्याच्या व्हिडीओवरुन पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

Nana Patole Video : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेचा तापलं आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने हाताने धुतल्याचे समोर आलं आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. नाना पटोलेंच्या या व्हिडीओवरुन राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपसह शिंदे गटाने टीका केली आहे. मात्र आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं. ईडीच्या कारवाईने जे अंधारात कोणाचे तरी पाय धुतात त्यांनाही दाखवा असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

सोमवारी अकोल्यातील वाडेगाव येथे मुक्कामी आलेल्या संत गजानन महाराज पालखी सोहळ्याला नाना पटोले यांनी हजेरी लावली. यावेळी पटोले यांची लाडूतुला देखील करण्यात आली. ही पालखी एका मैदानात थांबली होती आणि पावसामुळे तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या चिखलातून मार्ग काढत पटोले यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. त्यानंतर गाडी बसण्यासाठी जात असताना एका कार्यकर्त्यांने त्यांचे पाय पाण्याने धुतले. कार्यकर्त्याने स्वतःच्या हाताने चोळून नाना पटोले यांचे पाय धुतल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर नाना पटोले नागपूरकडे रवाना झाले. मात्र नाना पटोलेंनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं.

त्यानंतर आता नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. "तो व्हिडीओ मी पाहिला आहे. काल मी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे कार्यक्रमासाठी होतो. तिथेच गजानन महाराजांची पालखी तिथे मुक्कामासाठी होती.  ज्या मैदानात पालखी होती तिथे मी लोकांबरोबर पायी तिथे गेले. चिखल असल्याने माझे पाय खराब झाले.  पाय खराब झाल्यामुळे कार्यकर्त्याने पाणी आणलं आणि तो वरुन पाणी टाकत होता आणि मी हाताने पाय धुवत होतो. माझ्याबद्दल सध्या जास्त प्रेम आहे. पण ज्यांचे पाय ईडीने माखलेले आहेत ते अंधारात कोणाचे पाय धुतात हेसुद्धा दाखवा. मी तर वारकऱ्यांमध्ये गेले होतो. वारकऱ्यांना बदनाम करण्याचे काम फडणवीस सरकारच्या वेळी झालं. हर घर नल योजनेत नळच नाहीये. त्यामुळे वरुन पाणी टाकले," असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.

"मी शेतकरी आहे. मला चिखलाची सवय आहे. चिखल आहे म्हणून गजानन महाजारांच्या पालखीचे आशीर्वाद घेणार नाही असं नाही. मी राजा नाही. मी काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही ⁠मी चिखलात राहणारा माणूस आहे. ⁠ईडी आणि सीबीआयने कोणाचे किती पाय माखले आहेत आणि कोण कोणाचे पाय पकडत आहे हे माहीत आहे," असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसSocial Viralसोशल व्हायरलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस