शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ

By admin | Published: July 18, 2016 4:38 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.

विवेक भुसे,

पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे केवळ तीन महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांनी टोल वसुलीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.विशेष म्हणजे टोल कंपनी वाहनांची संख्येत फेरफार करते, असे आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आणि टोलचा पाठपुरावा केल्यानंतर आलेली नवी आकडेवारी काहीशी समाधानकारक आहे.आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये १३ लाख वाहने वाढली होती़ मात्र, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये तब्बल ६१ लाख वाहने वाढली असल्याचे दिसून येत आहे़ तसेच एप्रिल ते जूनमध्ये १३३ कोटी ७९ लाख ५२ हजार ४१३ रुपये टोल वसुली झाली. मागीलवर्षी याच काळात ११३ कोटी १६ लाख २० हजार २४४ रुपयांचा टोल वसूल झाला होता़२०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची माहिती आयआरबी कंपनीने सादर केली असून त्यात आजवरची सर्वाधिक वाहनसंख्या आणि टोल वसुलीतील वाढ दिसून आली आहे़ एक्स्प्रेस वे तसेच इतर महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. परिणामी टोलची रक्कमही कमी दाखविली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. पुणे -कोल्हापूर मार्गावरील किणी टोलनाक्यावर दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेली पाहणी आणि टोल कंपनीने दाखविलेल्या वाहनांच्या संख्येत मोठा फरक आढळला होता.आता तर टोल बंद करा!टोलवसुली करणाऱ्या कंपनीनेच उपरोक्त आकडेवारी दिली असल्याने ती खरी असणाऱ टोलमुक्तीचे आश्वासन देणारे आता काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे़ माहिती अधिकार कायद्याच्या बडग्यामुळे ही माहिती गेल्या वर्षी पुढे आली, तेव्हापासूनच टोल बंद झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे़- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचराज्य शासनाने माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांना अभ्यास करुन अहवाल देण्यास सांगितले होते़ त्यांनी शासनाला अहवाल दिला असून टोलमुक्तीसाठी काय करता येईल, याचा कृती अहवाल शासन तयार करीत आहे़