शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पीकविमा: फडणवीस म्हणतात फायदा; तर आदित्य ठाकरेंचा फसवणूक झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 13:40 IST

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पीक विम्याचा मुद्दा पुढे करत शिवसेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर विधानसभेत युती होणारच असे म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये परस्परविरोधी भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनांतर्गत दिलासा मिळाल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे पीक विम्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा दावा करत आहे.

विधानसभा निवडणुकीत पुन्हा युती होणार असल्याचे बोलले जात असले तरीही, शिवसेनेचे नेते भाजपवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. गेली पाच वर्षे शेतकरी कर्ज माफीच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने आत पीक विम्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये पीक विम्यावरून परस्परविरोधी भूमिका असल्याचे समोर आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या महाजनादेश यात्रेत शेतकऱ्यांना पीक विम्याचा दिलासा मिळाला असल्याचा दावा करत होते. तर दुसरीकडे त्यांच्याच सोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अनेकदा, खासगी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जन आशीर्वाद यात्रेतून  केला होता.  नुकसानग्रस्त शेतकरी हक्काचे पैसे मागायला गेले तेव्हा तुमच्या गावाचे नुकसान झाले नाही, केवळ तुमच्या शेताचे झाले, अशी उत्तरे कंपन्यांनी दिली असल्याचा दावा सुद्धा आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला होता. 

भाजप-सेनेत युतीसाठी दोन्ही पक्षाकडून प्रयत्न होत असले तरीही, मात्र शिवसेनेकडून भाजपवर टीका सुरूच आहे. आधी पीक कर्ज, पीक विमा आणि त्यातच आता आर्थिक मंदीचा मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षामधील परस्परविरोधी भूमिका पुन्हा समोर आली आहे.