शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

पीककर्ज फेडून शेतक-याने घेतला गळफास!

By admin | Published: March 12, 2016 2:39 AM

पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची संपवली यात्रा.

बोरगाव मंजू (अकोला): गत काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस, सततची नापिकी यामुळे हतबल झालेल्या कट्यार येथील एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. एरव्ही, कर्जाचे ओझे असह्य़ झाल्यामुळे शेतकर्‍यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना उघडकीस येतात. या शेतकर्‍याने मात्र पीक कर्जाचा पूर्ण भरणा केला आणि मग इहलोकीची यात्रा संपवली. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कट्यार येथील सुरेश किसन खराटे (४८) यांच्याकडे आठ एकर शेती असून, यावेळी त्यांच्या पिकांनाही अत्यल्प पावसाचा फटका सोसावा लागला. त्यामुळे सोयाबीन व तूर पीक हातचे गेले. लावलेला खर्चही न निघाल्याने ते चिंतेत होते. याच नैराश्यातून त्यांनी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, बाळू खराटे यांनी माहिती दिल्यानंतर, बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तवर, पोलीस उपनिरीक्षक उईके, हेडकॉन्स्टेबल अरुण गावंडे, जनार्दन चंदन, हरीश सातव यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. १२ फेब्रुवारीला केला होता कर्जाचा भरणानापीकीमुळे आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही सुरेश खराटे यांनी त्यांच्या डोक्यावर असलेले सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज फेडले होते. खराटे यांनी पिककर्ज म्हणून घेतलेली १ लाख १७ हजार ९२५ रुपयांची रक्कम १२ फेब्रुवारी रोजी सोसायटीत जमा केली. याबाबतचा ह्यनिलह्णचा दाखलाही त्यांना देण्यात आला आहे.