शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:41 IST

कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी ...

कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी फक्त शक्तिपीठच्या भूसंपादनात, सोयाबीन-तूर-कांदा-कापूस सडतोय शिवारात, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मात्र शिवारातील तणकाटात तर राज्यकर्ते, अधिकारी, दलाल मात्र राजमहालात असे वर्णन करावे लागेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.अर्थसंकल्पात औद्योगिक धोरणामध्ये कृषी औद्योगिक धोरणाला महत्त्व देणे गरजेचे होते. महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेले जाहीरनाम्यातील किमान हमीभावावर २० टक्के अनुदान , शेतकरी कर्जमाफी, खतांवरील राज्य सरकारचा जीएसटी कमी करणे, सोयाबीनला ६ हजार हमीभाव देणे, कृषी प्रक्रिया केंद्र उभारणी, पायाभूत सोयी सुविधा, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकरिता अधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधा, यासारख्या कोणत्याच गोष्टींचा यामध्ये उल्लेख नाही.शेती व्यवसायाला बगल दिल्याने याचे दुरगामी परिणाम शेतकरी व शेतमजुरांना भोगावे लागणार आहे. सिंचन कर आकारणी स्थगिती दिले असल्याचे जलसंपदामंत्री सांगत होते, मात्र त्याबाबत कोणतेच वक्तव्य वित्तमंत्री यांच्याकडून करण्यात आलेले नाही. एकीकडे बड्या उद्योगपतींच्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पाकरिता करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत व शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Agriculture Schemeकृषी योजनाAjit Pawarअजित पवारRaju Shettyराजू शेट्टी