शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

Maharashtra Election 2019 : ‘शेतकरी आत्महत्या आघाडी सरकारमुळेच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:52 IST

भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले.

मुंबई : विदर्भ, मराठवाडा या कृषी सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागांत शेतकऱ्यांच्या गेल्या काही वर्षांत आत्महत्या झाल्या. सिंचनसुविधा निर्माण न करता, घोटाळे करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची टीका केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी केली.

भाजपच्या प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत जावडेकर यांनी टीका केली की, ५० लाख शेतकऱ्यांचे २६ हजार कोटी रुपयांचे कर्ज देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले. शेतकºयांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी शेतीच्या शाश्वत विकास सुरू केला आणि विक्रमी सिंचन सुविधा निर्माण केल्या. आघाडी सरकारला १५ वर्षांत जमले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखविले.मोदींच्या सभेसाठी झाडे नियमानुसारच तोडलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील बुधवारच्या सभेसाठी स.प.महाविद्यालयाच्या मैदनातील झाडे तोडण्यावरून एवढी टीका कशासाठी, असा सवाल करतानाच प्रकाश जावडेकर यांनी झाडे तोडताना त्यापेक्षा पाचपट पर्यायी झाडे लावण्याचा नियमच आहे. त्यानुसार, कार्यवाही झाली असेल, तर आक्षेपाचे कारण नाही, असे मत मंगळवारी येथे व्यक्त केले.पत्रपरिषदेत जावडेकर म्हणाले की, या आधीही पंतप्रधान वा अन्य नेत्यांच्या जाहीर सभांसाठी झाडे तोडण्यात आली आहेत. पुण्याच्या मैदानावर झाडे कापताना नियमांचे पालन झालेले आहे. असे असताना उगाच टीका केली जात आहे. या आधी तसे घडलेले नव्हते.