शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी

By admin | Published: May 17, 2016 2:04 AM

परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे.

वडापुरी : परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. यामुळे पिण्याचे पाणी व चारा यांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे. एकीकडे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर दुसरीकडे चारादेखील शिल्लक नसल्याचे चित्र आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पडीक पडलेल्या शेतात मुक्या जनावरांवर कोसकोस फिरून वाळलेला चारा खाण्याची वेळ आली आहे. वडापुरी, अवसरी, काटी, पंधारवाडी, वरकुटे, अभंगवस्ती, राजगुरुवस्ती, विठ्ठलवाडी या परिसरात ज्वारी, गहू, मका, ऊस इत्यादी पिके मोठ्या प्रमाणत घेतली जातात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या भागात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे विहिरींना पाणीसुद्धा शिल्लक राहिले नाही. यामुळे मोठा दुष्काळ पाहावयास मिळाला. पाऊस पडला नसल्याने या वर्षी तर ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पिकेच घेतली नाही. पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे शेतातील बाटूकसुद्धा निघाले नाही. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. >जनावरे सोडली मोकळीसध्या या परिसरातील शेतकरी चारा उपलब्ध नसल्याने पडीक असलेल्या शेतीमध्ये जनावरांना मोकळे सोडून देत आहेत. काही प्रमाणात वाळलेला चारा आहे तो तरी खाऊन पोट भरेल म्हणून जनावरांना मोकळे सोडत आहे. पाऊस पडेपर्यंत पशुधन जगवावे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने दूध धंदासुद्धा कमी झाला आहे.