शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

शेतकऱ्यांना वीजबिल माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 2:47 AM

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून

पुणे : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून, बडे शेतकरी, बागायतदार आणि निर्यातदारही वीज बिले भरायला तयार नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना वीजबिल माफी देता येणार नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीवरील दंड, व्याज माफ करण्यात येणार आहे. त्यांना पाच टप्प्यात दर तीन महिन्यांनी ही थकबाकी भरता येईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहनही त्यांनी केले.विजेची निर्मिती, पुरवठा यासाठी प्रती युनिट सहा रुपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी हीच वीज १ रुपया २० पैशांनी पुरवण्यात येते. एका युनिटमागे पाच रुपयांची सूट देऊनही राज्यात जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी १८ हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्यातील मूळ रक्कम १५ हजार कोटींची असून ३ हजार कोटी रुपयांचे दंड व्याज आहे. शासनाने हे दंड व्याज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.ज्या जिल्ह्यातील अथवा गावांमधील वसुली होईल त्या पैशांमधून या गावांमध्ये नवीन कनेक्शन आणि नवीन कामे केली जाणार आहेत. थकबाकीची ही रक्कम वसूल करण्यासाठी गावागावात मेळावे घेण्यात येणार आहेत. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी हे मेळावे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. (प्रतिनिधी)वंचित १९ लाख कुटुंबाना वीज पुरवणार राज्यातील तब्बल १९ लाख कुटुंबापर्यंत अद्यापही वीज पोचलेली नाही. त्या कुटुंबांना २०१९ पर्यंत वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासोबतच आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बारा तासापर्यंत वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री-महाराष्ट्र सरकार