शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 09:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर (जि. लातूर) : राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बळीराजा सन्मान योजना सुरू केली असून, यात शेतकऱ्यांचे मागील थकीत वीजबिल माफ केले आहे. ७.५ एचपीपर्यंतच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा मोफत केला असून, मागील वीजबिलाची थकबाकी द्यायची नाही अन् पुढील वीजबिलही भरायचे नाही, असा ‘अर्थ’पूर्ण सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला. उदगीर येथे उपमुख्यमंत्री पवार यांची जनसन्मान यात्रा झाली. 

यावेळी मंचावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी रात्रीऐवजी आता दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यापुढील अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांचा सादर करू, असेही ते म्हणाले.

सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहणार nयावेळी अजित पवार म्हणाले, महायुती सरकारने लोककल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळे राज्यात आर्थिक संकट ओढावेल, असा आरोप विरोधक करीत आहेत.nमात्र, पुढील काळात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व योजना कायमस्वरूपी सुरूच राहतील. शेतकऱ्यांच्या मोफत वीजबिलासाठी १५ हजार कोटींची तरतूद केली आहे.nमाझ्याकडे दहा वर्षांपासून अर्थ खाते असल्याने विकासकामांसाठी निधींची तरतूद कशी करावी, आर्थिक गळती थांबवून आर्थिक सुबत्ता कशी आणावी, याचा आपणास अनुभव आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना पुढे सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त  केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी