शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

समन्वय समितीकडूनच शेतकऱ्यांची फरफट

By admin | Published: June 04, 2017 12:58 AM

शेतकरी आंदोलनाच्या समन्वय समितीतील काँग्रेस व भाजपाच्या समर्थकांनी विसंगत व धरसोड भूमिका घेतल्यामुळे फरफट झाल्याची शेतकऱ्यांची

- सुधीर लंके। लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शेतकरी आंदोलनाच्या समन्वय समितीतील काँग्रेस व भाजपाच्या समर्थकांनी विसंगत व धरसोड भूमिका घेतल्यामुळे फरफट झाल्याची शेतकऱ्यांची भावना असून, ही समन्वय समिती कोणी निवडली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणतांबा ग्रामस्थांनी ३ एप्रिलला संपाचा इशारा दिल्यानंतर समन्वय समितीची स्थापना झाली. त्यात डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव व धनंजय धोरडे हे स्थानिक नेते सक्रिय होते. नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जयाजीराव सूर्यवंशीही सामील झाले. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत १६ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. शुक्रवारी रात्री जयाजीराव सूर्यवंशी, जाधव यांनी धनवटे यांच्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संप मागे घेत असल्याची घोषणा केली. समन्वय समितीतच दोन गट आहेत.सूर्यवंशी, गिड्डे यांची खेळी आंदोलनाच्या कृती समितीत एकूण २१ सदस्यांचा समावेश आहे. मात्र, हे सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेला उपस्थित नव्हते. २१ सदस्यांची निवड कुणी व कशी केली? हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे. संदीप गिड्डे व सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला आहे.