शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत मिळाली ५३,७२७ कोटींची नुकसान भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 09:43 IST

त्यापैकी २६,४८४ कोटी रुपये पीकविम्याचे आहेत

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ व इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ५३,७२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली. त्यांपैकी २६,४८४ कोटी रुपये पीकविम्याचे आहेत.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना २७,२४३.४२ कोटी रुपयांची मदत दिलेली आहे. वारंवार होणाऱ्या पीक नुकसानीसाठी राज्याने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ)मधून निधी वापरला आहे. तसेच अत्यंत विपरीत स्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)कडून अतिरिक्त मदत मागितली आहे. हे उपाय थेट भरपाई न म्हणता मदत म्हणून वर्गीकृत केले जातात. राज्य वारंवार होणाऱ्या शेतीच्या नुकसानीशी झुंजत असल्यामुळे सरकार आर्थिक मदत वाढवत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान-आधारित पीक विमा योजना (डब्ल्यूबीसीआयएस) अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षांत एकूण २६,४८४ कोटी रुपये मिळाले. 

कोणत्या मुद्द्यांवर तज्ज्ञांनी दिला आहे भर?

महाराष्ट्राला हवामानाशी संबंधित कृषी आव्हानांचा सामना करावा लागत असताना दीर्घकालीन शाश्वत पद्धती, सुधारित सिंचन प्रणाली व हवामान-अनुकूल पिकांचा व्यापक अवलंब करण्याच्या गरजेवर तज्ज्ञांनी भर दिला आहे. याबरोबरच शेतीच्या धोरणांमध्ये संरचनात्मक बदल व शाश्वत शेतीमध्ये वाढलेली गुंतवणूक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे.

ठिबक सिंचनासाठी केंद्राकडून मदत

२०२३-२४मध्ये पीक विमा दाव्यांचे ८,५२०.१८ कोटी रुपये वितरित करण्यात आले. २०१५पासून ‘पर ड्रॉप मोर क्रॉप (पीडीएमसी) अंतर्गत राज्यातील १०.२५ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर ठिबक व स्प्रिंकलर सिंचनासाठी केंद्राने २,६०६.५५ कोटी रुपयांची मदत दिलेली आहे.

२१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळाले हवामान प्रशिक्षण

सन २०१८ पासून हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (पीओसीआरए) अंतर्गत राज्यातील २१ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचन पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी व शेतीवरील हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याचे धोरण विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास

मोहीम (एमआयडीएच), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसारख्या राज्य व केंद्र सरकारच्या योजनांतर्गत शेतकऱ्यांना शेततळे, विहिरी व सिंचन प्रणालींसाठी आर्थिक मदत दिली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा